शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 08:40 IST

Jayant Patil : बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे राजीनामा देणार, याची बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनाही माहिती नव्हती. याआधी त्यांनीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊ नका सल्ला दिला होता. राज्याच्या विकासासाठी  शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन केले होते. अडीच वर्षात विकासासाठी काम केले. लोकांच्या हितासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. बंडखोर आमदारांचे पाठबळ नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. हे यापुढेही जनतेच्या लक्षात कायम राहील. तसेच, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला कायम पाठिंबा दिला. पुढच्या काळात सर्व एकत्र बसून भूमिका ठरवण्यात येईल. शिवसेनेचे काही फुटीर आमदार अजितदादा आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत. पण, त्यांच्या मतदार संघात माहविकास आघाडी सरकारमुळे कोट्यवधी रुपये देण्याचे काम झाले. शिवसेना आमदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणत निधी मिळाला. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. रडीचा डाव खेळायचा असेल तर कुणाला तरी दोष द्यायचा, म्हणून अजितदादा, राष्ट्रवादीला दोष दिला आहे. तसेच,  १२ हजार कोटी रुपये निधी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाला दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ