शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 08:40 IST

Jayant Patil : बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे राजीनामा देणार, याची बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनाही माहिती नव्हती. याआधी त्यांनीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊ नका सल्ला दिला होता. राज्याच्या विकासासाठी  शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन केले होते. अडीच वर्षात विकासासाठी काम केले. लोकांच्या हितासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. बंडखोर आमदारांचे पाठबळ नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. हे यापुढेही जनतेच्या लक्षात कायम राहील. तसेच, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला कायम पाठिंबा दिला. पुढच्या काळात सर्व एकत्र बसून भूमिका ठरवण्यात येईल. शिवसेनेचे काही फुटीर आमदार अजितदादा आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत. पण, त्यांच्या मतदार संघात माहविकास आघाडी सरकारमुळे कोट्यवधी रुपये देण्याचे काम झाले. शिवसेना आमदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणत निधी मिळाला. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. रडीचा डाव खेळायचा असेल तर कुणाला तरी दोष द्यायचा, म्हणून अजितदादा, राष्ट्रवादीला दोष दिला आहे. तसेच,  १२ हजार कोटी रुपये निधी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाला दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ