शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 08:40 IST

Jayant Patil : बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे राजीनामा देणार, याची बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनाही माहिती नव्हती. याआधी त्यांनीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊ नका सल्ला दिला होता. राज्याच्या विकासासाठी  शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन केले होते. अडीच वर्षात विकासासाठी काम केले. लोकांच्या हितासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. बंडखोर आमदारांचे पाठबळ नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. हे यापुढेही जनतेच्या लक्षात कायम राहील. तसेच, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला कायम पाठिंबा दिला. पुढच्या काळात सर्व एकत्र बसून भूमिका ठरवण्यात येईल. शिवसेनेचे काही फुटीर आमदार अजितदादा आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत. पण, त्यांच्या मतदार संघात माहविकास आघाडी सरकारमुळे कोट्यवधी रुपये देण्याचे काम झाले. शिवसेना आमदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणत निधी मिळाला. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. रडीचा डाव खेळायचा असेल तर कुणाला तरी दोष द्यायचा, म्हणून अजितदादा, राष्ट्रवादीला दोष दिला आहे. तसेच,  १२ हजार कोटी रुपये निधी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाला दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ