शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

रस्त्यावर गद्दार फिरता कामा नये, लक्षात घ्या; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 17:42 IST

आम्ही शिवसेनेत आहोत, कुठली तुझी शिवसेना, कोण तुझा नेता? असा सवालही राऊतांनी शिंदे गटातील आमदारांना केला आहे.

अलिबाग - शिवसेनेच्या नावावर पैसे कमवताना आनंद दिघे आठवले नाही? उपमुख्यमंत्रीपद हवं, ईडीपासून सुटका हवी म्हणून हे बंड आहे. मर्दासारखं सामोरं जावं. या पळपुट्या आमदारांपासून सुटका मिळाली. राज्यात शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. आम्हाला हिंदुत्व कुणीही शिकवू नये. केंद्राच्या बंडखोरांना विशेष सुरक्षा दिली जाणार आहे. हे गद्दार रस्त्यावर फिरता कामा नये, बाळासाहेबांनी सांगितलंय रस्त्यावर उघडं करून मारा असं आवाहन संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, वर्षा बंगला सोडला तेव्हा देशातील जनतेच्या डोळ्यात पाणी आले. या तिन्ही पक्षांनी संयमी चेहरा सरकार चालवायला हवं म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आज जे बंडखोर झाले त्यांना भाजपामुळेच मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. गुलाम बनवून आमदारांना गुवाहाटीला ठेवले आहे. अडीच वर्षाचा शब्द भाजपाने पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. आपल्याला आता करेक्ट कार्यक्रम करायचा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दलाल पैशासाठी गेले. गळ्यात बोर्ड लावून उभं राहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी बेईमानी करतात. आम्ही शिवसेनेत आहोत, कुठली तुझी शिवसेना, कोण तुझा नेता? बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना वेगळी करता येत नाही. दुसरी शिवसेना निर्माण करता येणार नाही. ठाकरे आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. कित्येक लोकांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक गेले कुठेतरी गुलामच झाले. शिवसेना इथं आहे. नाव कशाला लावता असा सवाल संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, जिथे ठाकरे तिथे शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरून पाहतोय, ज्यांनी क्लेष दिला त्यांना त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. सुखाने झोप येणार नाही. आमचा एक शिवसैनिक १०० कोटींचा आहे. मावळ्यांच्या जीवावर शिवसेना पुढे जाईल. शिवसेना या चार अक्षरामुळे आम्ही आमदार, खासदार, मंत्री झालो. या शिवसेनेला सोडून तुम्ही जाणार असाल तर तुम्ही तुमची कबर खोलली. ही राजकीय कबर आहे. जनता त्यावर माती टाकल्याशिवाय राहणार नाही. रायगड जिल्ह्यात गवतालाही भाले फुकतात हा जिल्हा आहे. छत्रपतींची समाधी जिल्ह्यात आहे. गद्दारांना माफी नाही, काहीही झाले तरी झुकेगा नही असा इशाराही राऊतांनी दिला. 

मला तुरुंगात टाका, फासावर द्या पण लाखो शिवसैनिक असेपर्यंत शिवसेनेच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. शिवसैनिक स्वत:च्या पायावर ठाम राहिले पाहिजे. जास्तीत जास्त वेळ संघटनेसाठी दिला पाहिजे. रायगडात सूर्याजी पिसाळ निर्माण होतील वाटलं नाही. रायगडसुद्धा अश्रू ढाळत असेल. हा मेळावा नाही तर एका जिद्दीने पुढच्या लढाईचं फुकलेले रणशिंग आहे. सेनापती उद्धव ठाकरे यांना पुन्हा सन्मानाने वाजत गाजत वर्षा बंगल्यावर न्यायचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची सगळ्यांना शपथ आहे. महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, जिल्हा आपला यावर भगवा फडकतच राहणार ही खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ