शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

५ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:41 IST

आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं सुनावणी करू नये असं शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. मात्र त्यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही कार्यवाही केली नाही.

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयात ५ वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आणि उत्तर देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली. त्याविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेले. त्यानंतर कोर्टाने ११ जुलैपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली होती. मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात यावं असं मत मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मांडले होते. त्यावर आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट ५ किवा त्याहून जास्त न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करू शकतं असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. 

उज्ज्वल निकम म्हणाले की, आजच्या सुनावणीत फारसं काही होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात ५ वेगवेगळ्या याचिका आहेत. त्यात अनेक कायदेशीर मुद्दे आहेत. या सुनावणीसाठी मोठं घटनापीठ या सुनावणीसाठी स्थापन करावं लागेल. अरुणाचल प्रदेशच्या सुनावणीवेळी ५ न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले होते. अरुणाचलचा निर्णय इथं लागू होतो का हे पाहणं गरजेचे आहे. यावेळी ३ जणांचे घटनापीठ आहे. महाराष्ट्रातील प्रकरणात वेगळी बाजू आहे. पूर्ण घटनापीठ स्थापन करून सुनावणी घेऊ शकतात. सरन्यायाधीशांच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच भारतीय राज्य घटनेच्या विसंगत कृत्य महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून घडलंय का? हे पाहिले जाईल. १६ जणांच्या अपात्रतेची नोटीस ४८ तासांची काढली गेली त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात दिले. तेव्हा अंशत: दिलासा देत ११ जुलैपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली होती. आमदारांच्या अपात्रतेचा विषय हा विधिमंडळाच्या अख्यारित्य आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं सुनावणी करू नये असं शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. मात्र त्यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही कार्यवाही केली नाही. निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात असंही उज्ज्वल निकम म्हणाले. 

दरम्यान, सुप्रीम कोर्टात ५ याचिका आहेत. राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांना अधिवेशन बोलवण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे. घटनेच्या १७४ नुसार राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात काही आमदार राज्यपालांकडे गेले. त्यांनी मविआ सरकार अल्पमतात आल्याचं राज्यपालांना सांगितले. त्यानंतर राज्यपालांनी सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले. २९ जूनला बहुमताची चाचणी देण्याचे राज्यपालांनी सांगितले. ३० जूनला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. मागील युक्तिवादानुसार आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहावं लागेल असं निकम यांनी सांगितले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना