शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पिक्चर बाकी है?... धनंजय मुंडे रात्री उशिरा 'सागर' बंगल्यावर; देवेंद्र फडणवीसांशी अर्धा तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 11:00 IST

धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास भेट झाली.

मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात अखेर गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाचं पालन करत देवेंद्र फडणवीसही मंत्रिमंडळात सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरुवारीच्या घडलेल्या राजकीय ट्विस्टमुळे सगळ्याच नेत्यांना धक्का बसला. भाजपाच्या स्थानिक नेत्यांसह कुणालाही शिंदे मुख्यमंत्री बनतील याची कल्पना नव्हती. 

त्यात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवल्याने काहीशी निराशा पसरल्याचंही पाहायला मिळालं. राज्यातील या घडामोडीत रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंडे-फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. २०१९ मध्ये जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी सोहळा पार पडला. तेव्हा धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल होते. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 

राष्ट्रवादीची सावध प्रतिक्रियादेवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपात असताना कायम एकत्र राहिले आहेत. त्यांचे संबंध चांगले आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सदिच्छा भेट म्हणून धनंजय मुंडे घेतले असतील. शुभेच्छा देण्यासाठी मुंडे गेले असतील असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं. 

धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास भेट झाली. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली हे अद्याप समोर आली नाही. मात्र रात्री साडेबारा वाजता धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडीत या भेटीला विशेष महत्त्व आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार कोसळलं आहे. तर सुरुवातीला यात कुठेही भाजपाचा हात आहे असं दिसत नाही असं विधान अजित पवारांनी केले होते. राज्यातील सत्तानाट्यावर आक्रमक भाष्य करणंही अजितदादांनी टाळलं. त्यात धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नेमकं पडद्यामागे काय सुरू आहे याचं उत्तर आगामी दिवसात सगळ्यांसमोर येऊ शकतं. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ