शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

Devendra Fadnavis : राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत केला विशेष उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 12:37 IST

Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis's reply to Raj Thackeray's letter; Special mention made in the Legislative Assembly : आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाहीत. काही लोकं इकडच्या लोकांवर ईडी म्हणून ओरडत होती. हे खरेच आहे. ती ईडीमुळेच इथे आली. ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिले.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या सत्तानाट्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर नवीन सरकारच्या बहुमत चाचणीत संपुष्टात आला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेनेत बंड पुकारल्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतात आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोमवारी विधानसभेत शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यात १६४ आमदारांनी भाजपा-शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले. 

शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आभार प्रदर्शन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या पत्राचाही विशेष उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरंतर मी या पत्राला दुसऱ्या दिवशी उत्तर देण्याचा विचार केला. परंतु त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. मग मी त्यांना फोन करून आभार मानले. सध्या त्यांची तब्येत बरी नाही. मात्र लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ असं फडणवीसांनी सांगितले. 

तसेच आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाहीत. काही लोकं इकडच्या लोकांवर ईडी म्हणून ओरडत होती. हे खरेच आहे. ती ईडीमुळेच इथे आली. ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे. राजकारणात दोन्ही बाजू असतात. आमच्या एका एका नेत्यावर ३० खटले दाखल केलेत. खासदारांवर माझी गाडी देवदर्शनाला नेली त्याचे भाडे दिले नाही म्हणून केस झाली. हनुमान चालीसा म्हटली म्हणून घर तोडणार. माझे मुंबईत घर नाही ते बरे आहे. मी शासकीय बंगल्यात राहतो आणि नागपूरचं घर कायद्यात आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला. 

दरम्यान, हनुमान चालीसा वाचतो बोलले त्यानंतर जेलमध्ये पाठवलं. यावर स्वातंत्र्य चर्चा होईल. दोन्हीकडच्या व्यथा कशा दूर करता येईल. महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊ शकतात. जेवण करू शकतात. सत्तारुढ, विरोधकांची भूमिका वेगळी असू शकते. सत्ता येते आणि जाते. सत्तेचा अहंकार कधीही ठेऊ नये. जो निवडून येतो त्याला ५ वर्षाने परीक्षा द्यायची असते परंतु अनेकदा तो असा वागतो की त्याला जन्मभर आमदार, खासदार, मंत्रीच राहायचं. लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. हे सरकार कुठल्याही बदल्याच्या भावनेने वागणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

एकनाथ शिंदे जनसामान्यांना उपलब्ध असतीलएक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री झालेत. एकनाथ शिंदे यांची कारकिर्दी पाहिली तर राज्यात नेत्यांच्या उपलब्धतेची एक स्पेस तयार झालीय. आता येत्या काळात हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असेल. एका कॉलवरच उपलब्ध असेल. शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे