शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis : राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत केला विशेष उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 12:37 IST

Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis's reply to Raj Thackeray's letter; Special mention made in the Legislative Assembly : आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाहीत. काही लोकं इकडच्या लोकांवर ईडी म्हणून ओरडत होती. हे खरेच आहे. ती ईडीमुळेच इथे आली. ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिले.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या सत्तानाट्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर नवीन सरकारच्या बहुमत चाचणीत संपुष्टात आला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेनेत बंड पुकारल्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतात आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोमवारी विधानसभेत शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यात १६४ आमदारांनी भाजपा-शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले. 

शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आभार प्रदर्शन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या पत्राचाही विशेष उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरंतर मी या पत्राला दुसऱ्या दिवशी उत्तर देण्याचा विचार केला. परंतु त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. मग मी त्यांना फोन करून आभार मानले. सध्या त्यांची तब्येत बरी नाही. मात्र लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ असं फडणवीसांनी सांगितले. 

तसेच आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाहीत. काही लोकं इकडच्या लोकांवर ईडी म्हणून ओरडत होती. हे खरेच आहे. ती ईडीमुळेच इथे आली. ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे. राजकारणात दोन्ही बाजू असतात. आमच्या एका एका नेत्यावर ३० खटले दाखल केलेत. खासदारांवर माझी गाडी देवदर्शनाला नेली त्याचे भाडे दिले नाही म्हणून केस झाली. हनुमान चालीसा म्हटली म्हणून घर तोडणार. माझे मुंबईत घर नाही ते बरे आहे. मी शासकीय बंगल्यात राहतो आणि नागपूरचं घर कायद्यात आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला. 

दरम्यान, हनुमान चालीसा वाचतो बोलले त्यानंतर जेलमध्ये पाठवलं. यावर स्वातंत्र्य चर्चा होईल. दोन्हीकडच्या व्यथा कशा दूर करता येईल. महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊ शकतात. जेवण करू शकतात. सत्तारुढ, विरोधकांची भूमिका वेगळी असू शकते. सत्ता येते आणि जाते. सत्तेचा अहंकार कधीही ठेऊ नये. जो निवडून येतो त्याला ५ वर्षाने परीक्षा द्यायची असते परंतु अनेकदा तो असा वागतो की त्याला जन्मभर आमदार, खासदार, मंत्रीच राहायचं. लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. हे सरकार कुठल्याही बदल्याच्या भावनेने वागणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

एकनाथ शिंदे जनसामान्यांना उपलब्ध असतीलएक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री झालेत. एकनाथ शिंदे यांची कारकिर्दी पाहिली तर राज्यात नेत्यांच्या उपलब्धतेची एक स्पेस तयार झालीय. आता येत्या काळात हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असेल. एका कॉलवरच उपलब्ध असेल. शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे