शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maharashtra Political Crisis: "बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, ती माणसं मोठी झाली आणि विरोधात गेली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:46 IST

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. 

मुंबई - शिवसेनेचे दिग्गज नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 बंडकोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचे समर्थन काढल्याचे जाहीर केले, त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान, आताच सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारा निर्णय दिला. उद्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांवर टीकाही केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी गेल्यावेळेस म्हणालो होतो, काळजी करण्याची गरज नाही. ज्या गोष्टी चालू होत्या, त्या चालूस राहतील. तुमच्या आशिर्वादाने इथपर्यंची वाटचाल चांगली झाली. सरकार म्हणून आपण काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडला निधीन देऊन सुरुवात केली. हा एक योगायोग होता. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आतासुद्धा पीक विमा योजनेचे बीड पॅटर्न करुन घेतले.'' 

''या सगळ्या गोंधळात, काही गोष्टी बाजूला पडतात. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज मला विशेष समाधान आहे, आयुष्य सार्थकी लागलं. स्वतः शिवसेनाप्रमुखांनी ज्या शहराला संभाजीनगर नाव दिलं, त्याचे नामांतर माझ्या हाताने झाले. उस्मनाबादचेही धाराशिव केले. जिथे लहानाचा मोठा झालो, आता मुख्यमंत्री झालो, त्या वांद्रे वसाहतीत लोकांना भूखंड मंजूर केला.''

'सर्व सहकार्यांचे आभार'

ते पुढे म्हणाले की, '' असे म्हणतात ना एखादी गोष्ट चांगली चालू असते, तेव्हा दृष्ट लागते. कोणाची लागली, ते तुम्हाला माहिती आहे. आज मला सोनिया , शरद पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहे. दुःख या गोष्टीचे वाटले की, या ठरावाच्या वेळेस आम्ही फक्त चार मंत्री होतो, बाकीचे मंत्री तुम्ही जानता कुठे आहेत. इतर पक्षांनी एका शब्दानेही या नामांतराला विरोध केला नाही, त्यांना धन्यवाद. ज्यांचा विरोध होता असं भासवलसं जात होतं, ते सोबत राहिले आणि जे सोबत होते, ते विरोधात गेले. 

'बाळासाहेबांनी खूप काही दिलं'

''बाळासाहेबांनी अनेक लहानांना मोठं केलं. नगरसेवक, आमदार खासदार आणि मंत्रीही केलं. ही माणसे मोठी झाली, मोठी झाल्यानंतर आम्हालाच विसरले. ज्यांना मोठं केलं, सत्ता आल्यानंतर शक्य ते सगळं दिलं, ती लोक आज नाराज आहेत. मी मातोश्रीवर आल्यानंतर साधी माणसं येथे येतायत, ते म्हणतात आम्ही सोबत आहोत. ज्यांना दिलं, ते नाराज, ज्यांना काही दिलं नाही, ते सोबत आहेत. याला म्हणतात शिवसेना. या नात्याच्या जोरावर सेना उभी आहे. अनेक आव्हान या लोकांच्या सोबतीने परतवत आली आहे.'' 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय