शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 11:34 IST

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.

मुंबई : मनसेने रविवारी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मनसेला टोला लगावला आहे. गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले असल्याचे, सामंत यांनी म्हटले आहे.

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले की, मनसेने काही दिवसांपूर्वी त्यांचा झेंडा बदलला, विचारधारा बदलली आणि त्यांच्यानंतर त्यांचा काढलेला हा पहिला मोर्चा आहे. हा मोर्चा चांगला झाला की वाईट हे आपल्याला निवडणुकीनंतर कळणार आहे.

तर या मोर्च्याचे रुपांतर जर मतांमध्ये झाले तरच या मोर्च्याला काही अर्थ आहे. मात्र या पक्षांची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या नेत्यांच्या सभेला आणि भाषणांना गर्दी होते, पण त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने अनेकवेळा दाखवून दिले असल्याचा टोला त्यांनी मनसेला लगावला. तसेच हा मोर्चा मनसेने स्वता: काढला आहे की त्यांना भाजपने काढायला सांगितला आहे, हे मला सांगता येणार नाही.परंतु या मोर्च्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नसल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.