शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 11:34 IST

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.

मुंबई : मनसेने रविवारी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मनसेला टोला लगावला आहे. गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले असल्याचे, सामंत यांनी म्हटले आहे.

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले की, मनसेने काही दिवसांपूर्वी त्यांचा झेंडा बदलला, विचारधारा बदलली आणि त्यांच्यानंतर त्यांचा काढलेला हा पहिला मोर्चा आहे. हा मोर्चा चांगला झाला की वाईट हे आपल्याला निवडणुकीनंतर कळणार आहे.

तर या मोर्च्याचे रुपांतर जर मतांमध्ये झाले तरच या मोर्च्याला काही अर्थ आहे. मात्र या पक्षांची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या नेत्यांच्या सभेला आणि भाषणांना गर्दी होते, पण त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने अनेकवेळा दाखवून दिले असल्याचा टोला त्यांनी मनसेला लगावला. तसेच हा मोर्चा मनसेने स्वता: काढला आहे की त्यांना भाजपने काढायला सांगितला आहे, हे मला सांगता येणार नाही.परंतु या मोर्च्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नसल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.