शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

महाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा...'हे' २२ जिल्हे प्रस्तावित; जाणून घ्या, राज्याविषयी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 05:58 IST

सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे.

मुंबई - भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला. अनेक जिल्हे हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय समोर येऊ लागली. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन जिल्हा निर्मिती सुरू झाली. मात्र, त्यासाठी २० वर्षांचा कालखंड जावा लागला. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन १० जिल्ह्यांची भर पडून आपला महाराष्ट्र ३६ जिल्ह्यांचा झाला आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जिल्ह्यात शेवटच्या गावातून येणाऱ्या नागरिकाला अवघा दिवस खर्ची घालावा लागतो. त्यामुळे २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.

सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे.

१० जिल्ह्यांचे बॉम्बे स्टेट 

तेव्हा खान्देश, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे १० जिल्हे होते.

१ मे १९६० : द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन झाले. मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरातची निर्मिती.

प्रारंभीचे २६ जिल्हेठाणे, कुलाबा (आताचे नाव रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) हे २६ जिल्हे नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.

१९८१ पासून आतापर्यंत झाले हे १० जिल्हे    या जिल्ह्यातून  हा जिल्हा तयार    रत्नागिरी  -  सिंधुदुर्ग (१ मे १९८१)    छ. संभाजीनगर  -  जालना (१ मे १९८१)    धाराशिव  -  लातूर (१६ ऑगस्ट १९८२)    चंद्रपूर  -  गडचिरोली (२६ ऑगस्ट १९८२)    बृहन्मुंबई  -  मुंबई उपनगर (१ ऑक्टो. १९९०)    अकोला  -  वाशिम (१ जुलै १९९८)    धुळे  -  नंदुरबार (१ जुलै १९९८)    परभणी    हिंगोली (१ मे १९९९)    भंडारा  -  गोंदिया (१ मे १९९९)    ठाणे  -  पालघर (१ ऑगस्ट २०१४)

आणखी २२ जिल्हे प्रस्तावित((२०१८ मध्ये स्थापन समितीचा प्रस्ताव)

या जिल्ह्यातून हे जिल्हे शक्य

नाशिक - मालेगाव, कळवण

पालघर - जव्हार

ठाणे - मीरा भाईंदर, कल्याण

अहमदनगर -  शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर

पुणे - शिवनेरी

रायगड - महाड

सातारा - माणदेश

रत्नागिरी - मानगड

बीड - अंबेजोगाई

लातूर - उदगीर

नांदेड - किनवट

जळगाव - भुसावळ

बुलडाणा - खामगाव

अमरावती - अचलपूर

यवतमाळ - पुसद

भंडारा - साकोली

चंद्रपूर - चिमूर

गडचिरोली - अहेरी

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र