शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 07:15 IST

Dangerous bridge In Thane and Raigad: वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पुलांची अवस्था बिकट

ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांमधील पूल हे तुलनेने सुस्थितीत असले तरी ग्रामीण भागातील अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत किंवा त्यांच्या देखभालीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. पुण्यात पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ शकते, अशी भीती विविध पुलांची अवस्था पाहिल्यावर व्यक्त होत आहे.

मावळ येथील कुंडमळा धोकादायक पूल कोसळल्यानंतर ठाणे व रायगढ़ जिल्ह्यातील धोकादायक पुलांचा लोकमतने आढावा घेतला. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. कुठे पुलाला कठडे नाहीत तर कुठे पुलातून झाड उगवले आहे. काही पूल २०० वर्षे जुने झाले तरी त्याची दुरुस्ती नाही, तर काही तसेच पडून आहेत.

शहापूर, मुरबाड व कल्याण या तालुक्यांना ओडणारावासिंदजवळील भातसा नदीवरील गैरसे पूल हा असाच वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक झाला आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरील दोन्ही बाजूंकडील कठडे तुटलेले आहेत. या धोकादायक पुलाकडे मनसेचे वासिंद शहरप्रमुख अमोल बोराडे यांनी लक्ष वेधले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्याणचे उ कार्यकारी अभियंता एन. बी. हिरवे यांनी सोमवारी पुलाची पाहणी केली. या पुलावरील स्लॅब मजबूत असून पूल कमकुवत झालेला नाही. पुलाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत, लवकरच त्यावर उपाययोजना केली जाईल, असे हिरवे यांनी सांगितले.

दहिवली पुलावर दरवर्षी पाणीकर्जत तालुक्यात मोहिली व नेरळ नजीकच्या दहिवली पुलावरून दरवर्षी पाणी जाते. कर्जत शहरातील उल्हास नदीवर असलेला पूल सर्वांत जुना आहे. तो दगडी कमानीच्या पद्धतीने बांधला असल्याने ६०-६५ वर्षापूर्वी बांधलेला हा पूल दररोज मोठमोठी वाहनांचे वजन पेलतो. हा पुल कधीही कोसळू शकतो, असे रहिवासी सांगतात. वासरे खॉड्यातील मोहिली गावाजवळ सुमारे ४५ वर्षापूर्वी बांधलेल्या पुलावरून गेल्या चार वर्षांपासून पाणी जात आहे. माहिनी पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे, दहिवली पुलाची बांधकाम विभागाकडे आहे.

हा पूल अपघाताला कारणीभूत ठरू शकतोअलिबाग तालुक्यातील पालव गाव ते थेरौंडा आगलेची वाडीमधील खाडीवरील साकव सुमारे सात दशकांचा असलेला पूर्णपणे जीर्ण झालेला असून तो नवीन बांधावा, अशी मागणी आहे. हा साकव नव्याने उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल, तसेच त्या भागात येत असलेल्या विविध प्रकल्पांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.सध्या तरी जीवनवाहिनी असणारा हा साकच जीर्ण झाला आहे. तो अपघाताला कारणीभूत ठरू शकतो, अशीच परिस्थिती आहे. या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम रायगड जिल्हा परिषदेकडे आहे.

पिलरला रंगरंगोटी, पूल मात्र तसाचअंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या परिसरात मंदिरात जाण्यासाठी वालधुनी नदीवर दोन पूल आहेत. अत्यंत वर्दळीचा हा पूल पावसात पाण्याखाली जातो. मंदिरात गर्दीच्या वेळेस दर्शनाची रांग पुलापर्यंत येते. पावसाळ्यात हा पूल वाहून आण्याचा धोका निर्माण झाला आहे. याआधी या पुलाचे कठडे अनेक वेळा वाहून गेले आहेत. मात्र, या पुलाची हवी तशी दुरुस्ती झालेली नाही.

पूल बंद तरीही वाहतूक सुरू, रोज पार्किंगही होतेरायगड जिल्ह्यात ब्रिटिशकालीन महाड पूल २०१६ मध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्याने ४० नागरिकांचा पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यभरात धोकादायक ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते वाहतुकीस बंद केले. त्यापैकीच पनवेल शहराला जोडणारा गाढी नदीवरील पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला असला, तरी त्यावरील वाहतूक अद्यापही सुरूच आहे.

६२ वर्षांपासून पुलाची डागडुजी झालेली नाहीमुरूडला जोडणाऱ्या एकदरा पुलाची ६२ वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. त्याचे कठडे व बेरिंग पूर्णतः खराब झाल्याने हा पूल धोकादायक बनला होता. या पुलावरून एकदरा, माझेरी, जंजिरा किल्ला, राजपुरी, खोरा, डोंगरी या गावांतील ग्रामस्थ दररोज मुरुड शहराकडे रोज ये-जा करतात. पुलाच्या डागडुजीसाठी बांधकाम विभागाला ४ कोटी रुपये मंजूर केले होते. काम २० जानेवारी २०२३ पासून सुरु झाले पण ३ महिन्यातच काम बंद पडले.

२०० वर्षापूर्वीच्या पुलावरून अजूनही वाहतूक सुरूअलिबाग तालुक्यातील खडताळ पूल हा २०० वर्षापूर्वी बांधण्यात आला आहे. तो आता जीर्ण झाला आहे. मात्र त्याची दुरुस्ती अद्यापही केली नाही. त्यामुळे हा पूल कथीही पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे हजारो पूल, साकच आहेत. यातील अनेक जीर्ण होत चालले आहेत. ते बंद करून नवीन बांधणे आवश्यक आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले आहे.

टॅग्स :RaigadरायगडthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे