शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:58 IST

Maharashtra CM Swearing-in Ceremony: प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Maharashtra CM Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, तत्पूर्वी, दिवसभर नाराजीचे मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले.

राजभवनावर जाऊन महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, यावर एकनाथ शिंदे यांचे एकमत होते नव्हते. शपथविधी सोहळ्याला काही तास राहिले असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांची मनधरणी केली. शपथविधी सोहळ्यानंतर अमित शाह यांच्याशी बैठक होण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर अखेर मानापमान नाट्यावर पडदा पडला आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. 

वास्तविकता काय आहे हे आपल्याला पाहावेच लागते

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. भाजपाचे १०५ आमदार असताना एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन आले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा सगळ्यांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण वेगळेच झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, बाहेर राहून सरकारला पूर्णपणे पाठिंबा देणार. परत केंद्रातून आदेश आला की, तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करा. त्यांना थोडे दुःख तरी झालेच असेल. त्यांनी त्या आदेशाचे पालन केले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतले, जीव तोडून मेहनत केली. पदाला न्याय दिला आणि त्यांच्या पक्षाचे १३२-१३३ आमदार निवडून आले. नाराज तर तेपण झाले. त्यांचे नाराज होणे चूक म्हणत नाही. पण वास्तविकता काय आहे हे आपल्याला पाहावेच लागते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, हे तीन प्रमुख आहेत. तीन जण एकत्र आले की तिन्ही पक्ष एकत्र आल्याचा संदेश जाईल. प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. एखाद्याचे मंत्रीपद गेले की तो नाराज होतो, हे स्वाभाविक आहे. जर एखाद्याचे मुख्यमंत्रीपद गेले आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करायला सांगितले तर कोण नाराज होणार नाही? हा मानवी स्वभाव आहे, मीही नाराज झालो असतो, असे भुजबळ यांनी म्हटले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना