शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आघाडी सरकारला धोका नाही : एच. के. पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:49 IST

काँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप पक्षात दोन गट पडल्याचे चित्र

व्यंकटेश केसरीमहाराष्ट्रातील महाविकास आघाडीत काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा उघड आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला असला तरी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील सरकारला धोका नाही. ते त्याचा कार्यकाळ पूर्ण करील, असे म्हटले. नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपांपासून चार हात दूर राहताना अखिल भारतीय काँग्रेस समितीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असे रविवारी रात्री स्पष्ट केले.

“महाविकास आघाडी सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील. काम करणारे सरकार देण्याचे आणि किमान समान कार्यक्रम राबवण्यास आम्ही लोकांशी बांधील आहोत. सरकार अस्थिर करण्याचा आमच्या बाजूने काही प्रश्नच नाही,” असे एच. के. पाटील म्हणाले. पटोले यांनी काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा केलेला आरोप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवरील टीकेबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, “ती जुनी कथा झाली.”  नेते राहुल गांधी यांचा भक्कम पाठिंबा असलेले पटोले राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा वा विचारविनिमय न करता आक्रमकपणे आपले पत्ते खेळत आहेत. मुख्य विरोधक भाजपवर हल्ला करताना पटोले आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोडत नाहीत. राज्य विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे त्यांना वाटत होते; पण तसे घडले नाही. 

पक्षात गट पडलेनाना पटोले यांचा काँग्रेसला पुन्हा चेतना आणण्याचा प्रयत्न असताना ते स्वत:ला पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून सादर करतात तसेच त्यांची राज्य सरकारमध्येही सहभागी व्हायची इच्छा आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते हे महाराष्ट्रातील वस्तुस्थिती पक्ष नेतृत्वाला सांगण्यासाठी दिल्लीत येत आहेत, यातून पक्षात तीव्र गट पडले असल्याचे दिसते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र