शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपासारखं धाडसं शिवसेनेनं दाखवलं असतं तर चित्र वेगळं असतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 11:20 IST

शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता.

मुंबई - गुरुवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी दिल्याचं पाहायला मिळालं. राज्यातही शिवसेना-भाजपा युतीला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र शिवसेनेतील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. चंद्रकांत खैरे, अनंत गीते, शिवाजी आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ अशा दिग्गजांना मोदीलाटेतही पराभूत व्हावं लागलं. 

शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र पालटलं. शिवसेनेने निवडणुकीच्या निकालात आपल्या जागा राखल्या. मागील लोकसभा निकालात शिवसेनेचे 18 खासदार जिंकले होते यंदाच्या निकालातही शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले. मात्र ज्या नेत्यांबद्दल शिवसेनेला विश्वास होतो त्याच प्रस्थापित नेत्यांना जनतेने नाकारलं. या पराभवाचं चिंतन शिवसेनेला नक्की करावं लागणार आहे. 

अमरावतीत आनंदराव अडसूळ, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव, रायगड अनंत गीते, औरंगाबाद चंद्रकांत खैरे गेली अनेक वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. यंदाच्या निवडणुकीत ज्याप्रकारे भाजपाने आपल्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याचं धाडस दाखवलं तसं शिवसेनेने केलं असतं तर बहुदा राज्यातील निकालात शिवसेनेच्या खासदारांचे आकडे वाढले असते असचं म्हणावं लागेल. भाजपाने राज्यात सोलापूरचे शरद बनसोडे, लातूरचे सुनील गायकवाड, अहमदनगरचे दिलीप गांधी, पुण्याचे अनिल शिरोळे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दिंडोरी हरिशचंद्र चव्हाण, जळगावचे ए.टी नाना पाटील  या विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आणि या जागांवर नवीन उमेदवारांना संधी दिली. याठिकाणी भाजपाने पुन्हा विजय मिळविला असून शिवसेनेला हे जमलं नाही. 

शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगडमध्ये अनंत गीते, अमरावतीत आनंदराव अडसूळ, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात जनमानसात तसेच पक्षांतर्गत नाराजी होती. शिरुर लोकसभेचं तिकीट द्यावं यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. मात्र तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. अखेर शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रस्थापित शिवाजी आढळराव पाटील यांना धक्का देत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला. निकालांवरुन स्पष्ट होतं की, शिवसेनेच्या प्रस्थापितांना जनतेने नाकारलं. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जर उमेदवार बदलण्यावर शिवसेनेकडून चिंतन झालं असतं तर शिवसेनेच्या खासदारांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली असती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShiv SenaशिवसेनाBJPभाजपा