शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
4
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
5
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
6
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
7
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
8
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
9
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
10
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
11
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
12
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
13
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
14
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
15
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
16
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
17
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
18
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
19
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
20
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:58 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघांमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. आज मुंबईत शिवाजी पार्क येथे महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे. तर बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी इंडिया आघाडीची सभा होणार आहे. त्यातही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिकेच्या वॉर्डनिहाय सभांसाठी निमंत्रण दिलं पाहिजे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सभांवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने या महराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या ३०-३५ च्या वर सभा होत आहेत. याचा अर्थ येणाऱ्या काळात भाजपाला नरेंद्र मोदी हे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका, नगरपंचायत, ग्राम पंचायत यांच्या प्रचारालासुद्धा लागतील, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

यावेळी अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केलेल्या रोड शोवरही टीका केली. ते म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना मुंबईत पहिल्यांदा रोड शो करावा लागला, ही ताकद महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्राच्या मातीत आहे. सगळी दुनिया बंद करायची, मुंबई बंद करायची आणि रोड शो करायचा हा कुठला प्रकार आहे. बाजूलाच झालेल्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाला होता. तिथून रोड शो गेला, हे संवेदनाहिनतेचं लक्षण आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.

मोदी आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याने त्याचा काही फरक पडेल का, असं विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. राज ठाकरे यांच्या मनसेच्या इंजिनामध्ये भाजपाचा कोळसा भरला आहे. त्यावर ते चालू आहे. ज्या पक्षाचा एक उमेदवार उभा नाही तो पक्ष गावोगावी, घरोघरी जाऊन प्रचार करतोय, सुपारी घेण्याचा प्रकार किती उच्च स्तरावर असतं याचं उदाहरण राज ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे.   

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMahayutiमहायुतीAmbadas Danweyअंबादास दानवेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४