शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:58 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघांमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. आज मुंबईत शिवाजी पार्क येथे महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे. तर बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी इंडिया आघाडीची सभा होणार आहे. त्यातही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिकेच्या वॉर्डनिहाय सभांसाठी निमंत्रण दिलं पाहिजे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सभांवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने या महराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या ३०-३५ च्या वर सभा होत आहेत. याचा अर्थ येणाऱ्या काळात भाजपाला नरेंद्र मोदी हे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका, नगरपंचायत, ग्राम पंचायत यांच्या प्रचारालासुद्धा लागतील, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

यावेळी अंबादास दानवे यांनी नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केलेल्या रोड शोवरही टीका केली. ते म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना मुंबईत पहिल्यांदा रोड शो करावा लागला, ही ताकद महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्राच्या मातीत आहे. सगळी दुनिया बंद करायची, मुंबई बंद करायची आणि रोड शो करायचा हा कुठला प्रकार आहे. बाजूलाच झालेल्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाला होता. तिथून रोड शो गेला, हे संवेदनाहिनतेचं लक्षण आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.

मोदी आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याने त्याचा काही फरक पडेल का, असं विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. राज ठाकरे यांच्या मनसेच्या इंजिनामध्ये भाजपाचा कोळसा भरला आहे. त्यावर ते चालू आहे. ज्या पक्षाचा एक उमेदवार उभा नाही तो पक्ष गावोगावी, घरोघरी जाऊन प्रचार करतोय, सुपारी घेण्याचा प्रकार किती उच्च स्तरावर असतं याचं उदाहरण राज ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे.   

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMahayutiमहायुतीAmbadas Danweyअंबादास दानवेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४