शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 09:08 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी (BJP) अडचणीची ठरताना दिसत आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनीही ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी अडचणीची ठरताना दिसत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मोदींना ४०० हून अधिक जागा ह्या संविधानामध्ये बदल करण्यासाठी हव्या असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हा दावा खोडून काढताना मोदी आणि भाजपाची दमछाक होत आहे. दरम्यान, काँग्रेसचेकोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, तुम्ही कधी विचार केलाय की चारशे पार म्हणजे काय? चारशे पार ही धोक्याची घंटा आहे. ते २७२ का म्हणत नाहीत? ५४३ खासदारांमध्ये निम्मं करा ना तुम्ही? म्हणजे २७२ होतात. ठीक आहे २७२ म्हणायला अवघड होतं मग ३०० म्हणा. पण ४०० का? ४०० पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचं आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही तर कायदा बदलायचा आहे, असा घणाघाती आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्व नेत्यांनी ४०० पारची घोषणा आणि संविधान बदलण्यावरून मोदी आणि भाजपाला घेरले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४