शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 20:18 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यातील काही मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (NCP SP) करण्यात आली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान आटोपून आठवडा उलटला तरी नेतेमंडळींमधील आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मतदान आटोपल्यानंतर १५-२० दिवसांनी फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद असल्याचा टोला सुनील तटकरे यांनी लगावला आहे. 

शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुका होत असताना ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मीसुद्धा काही प्रसंग अनुभवले  आहेत. फेरमतदानाची मागणी ही त्याक्षणी किंवा संध्याकाळी होते. अगदीच खूप काही झालं तर दुसऱ्या दिवशी होते. यंत्र बिघडली तर त्यावेळी ती केली जाते. १५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर या पद्धतीची मागणी केली जाते हे हास्यास्पद आहे, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. 

अलीकडे कुठेही बसून व्हिडिओ काढणे आणि प्रसारित करणे आणि जणू ते त्या प्रत्यक्ष स्थितीतील आहेत, अशा पद्धतीचा आभास निर्माण करणे, असे प्रकार आज ज्यांना फारसे काम उरले नाही ते करत आहेत. त्यांनी मागणी जरूर करावी, लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे. बीडचे मतदान होऊन पंधरा दिवस उलटले आणि फेरमतदानाची मागणी आता केली जात आहे. निवडणुकीत पराजय अधिक स्पष्ट झाल्याचे हे द्योतक आहे, असे सुनील तटकरे म्हणाले. 

दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागांचं भाकित करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाही सुनील तटकरे यांनी टोला लगावला. पृथ्वीराज चव्हाण यांनी ४८- ० जागा येतील असे सांगायला हवे होते. त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी चार वर्षे महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे चंद्र- सूर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, अशी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची अपेक्षा आहे, असा टोला सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४