शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 20:18 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यातील काही मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (NCP SP) करण्यात आली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान आटोपून आठवडा उलटला तरी नेतेमंडळींमधील आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मतदान आटोपल्यानंतर १५-२० दिवसांनी फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद असल्याचा टोला सुनील तटकरे यांनी लगावला आहे. 

शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुका होत असताना ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मीसुद्धा काही प्रसंग अनुभवले  आहेत. फेरमतदानाची मागणी ही त्याक्षणी किंवा संध्याकाळी होते. अगदीच खूप काही झालं तर दुसऱ्या दिवशी होते. यंत्र बिघडली तर त्यावेळी ती केली जाते. १५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर या पद्धतीची मागणी केली जाते हे हास्यास्पद आहे, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. 

अलीकडे कुठेही बसून व्हिडिओ काढणे आणि प्रसारित करणे आणि जणू ते त्या प्रत्यक्ष स्थितीतील आहेत, अशा पद्धतीचा आभास निर्माण करणे, असे प्रकार आज ज्यांना फारसे काम उरले नाही ते करत आहेत. त्यांनी मागणी जरूर करावी, लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे. बीडचे मतदान होऊन पंधरा दिवस उलटले आणि फेरमतदानाची मागणी आता केली जात आहे. निवडणुकीत पराजय अधिक स्पष्ट झाल्याचे हे द्योतक आहे, असे सुनील तटकरे म्हणाले. 

दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागांचं भाकित करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाही सुनील तटकरे यांनी टोला लगावला. पृथ्वीराज चव्हाण यांनी ४८- ० जागा येतील असे सांगायला हवे होते. त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी चार वर्षे महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे चंद्र- सूर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, अशी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची अपेक्षा आहे, असा टोला सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४