शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

जागावाटपावरून पेच, आघाडी धर्माची आठवण; भाजपाविरोधी INDIA आघाडीची घडी विस्कटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 14:06 IST

Loksabhe Election 2024: महाराष्ट्रात एप्रिल, मे या दोन महिन्यात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा टप्प्यात मतदान होईल. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून अद्यापही भाजपाविरोधी इंडिया आघाडी यांच्यात एकवाक्यता नाही. आधी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीचं फिस्कटलं, त्यानंतर पंजाबमध्येही आघाडी तुटली आणि आता महाराष्ट्रात जागावाटपावरून आघाडीतील घटक पक्षांमधला तिढा सुटत नाही. बिहारमध्येही नाराजीचं वातावरण आहे. बुधवारी बिहार आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ज्यामुळे इंडिया आघाडीत काही आलबेल नाही असं चित्र समोर दिसले. महाराष्ट्रात ५ तर बिहारमध्ये ४ टप्प्यात निवडणूक होणार आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. याठिकाणी ६ जागांवर वाद आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ३ महिन्यात आघाडीने चर्चेद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु एका जागेवर ३-३ दावेदार असल्याने एकमत झाले नाही. शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ज्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गट नाराज झाला. आघाडी धर्माचे पालन करायला हवे होते. ठाकरेंनी एकतर्फी निर्णय घेतल्याने काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. ज्या जागांवर वाद नाही अशा जागांवर काँग्रेसनं उमेदवार घोषित केलेत. 

दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, सांगली आणि भिवंडी या जागेवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसमध्ये अद्याप तोडगा नाही. त्यात उद्धव ठाकरेंनी मुंबई दक्षिण मध्य जागेवर अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. ज्याठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इच्छुक आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली तिथे काँग्रेसचे संजय निरुपम इच्छुक होते. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी घोषित केली. जिथे विशाल पाटील काँग्रेसकडून प्रमुख दावेदार होते. भिवंडीच्या जागेवर शरद पवार आणि काँग्रेस दोघांनी दावा केला आहे.

महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. मागील २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने आणि ओवैसींच्या एमआयएमनं एकत्रित निवडणूक लढवली होती. परंतु केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळाला. मात्र या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक जागा पडल्या. आता महाविकास आघाडी आणि महायुती, वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत अनेक मतदारसंघात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात एप्रिल, मे या दोन महिन्यात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा टप्प्यात मतदान होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस