शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जागावाटपावरून पेच, आघाडी धर्माची आठवण; भाजपाविरोधी INDIA आघाडीची घडी विस्कटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 14:06 IST

Loksabhe Election 2024: महाराष्ट्रात एप्रिल, मे या दोन महिन्यात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा टप्प्यात मतदान होईल. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून अद्यापही भाजपाविरोधी इंडिया आघाडी यांच्यात एकवाक्यता नाही. आधी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीचं फिस्कटलं, त्यानंतर पंजाबमध्येही आघाडी तुटली आणि आता महाराष्ट्रात जागावाटपावरून आघाडीतील घटक पक्षांमधला तिढा सुटत नाही. बिहारमध्येही नाराजीचं वातावरण आहे. बुधवारी बिहार आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ज्यामुळे इंडिया आघाडीत काही आलबेल नाही असं चित्र समोर दिसले. महाराष्ट्रात ५ तर बिहारमध्ये ४ टप्प्यात निवडणूक होणार आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. याठिकाणी ६ जागांवर वाद आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ३ महिन्यात आघाडीने चर्चेद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु एका जागेवर ३-३ दावेदार असल्याने एकमत झाले नाही. शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ज्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गट नाराज झाला. आघाडी धर्माचे पालन करायला हवे होते. ठाकरेंनी एकतर्फी निर्णय घेतल्याने काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. ज्या जागांवर वाद नाही अशा जागांवर काँग्रेसनं उमेदवार घोषित केलेत. 

दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, सांगली आणि भिवंडी या जागेवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसमध्ये अद्याप तोडगा नाही. त्यात उद्धव ठाकरेंनी मुंबई दक्षिण मध्य जागेवर अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. ज्याठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इच्छुक आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली तिथे काँग्रेसचे संजय निरुपम इच्छुक होते. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी घोषित केली. जिथे विशाल पाटील काँग्रेसकडून प्रमुख दावेदार होते. भिवंडीच्या जागेवर शरद पवार आणि काँग्रेस दोघांनी दावा केला आहे.

महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. मागील २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने आणि ओवैसींच्या एमआयएमनं एकत्रित निवडणूक लढवली होती. परंतु केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळाला. मात्र या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक जागा पडल्या. आता महाविकास आघाडी आणि महायुती, वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत अनेक मतदारसंघात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात एप्रिल, मे या दोन महिन्यात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा टप्प्यात मतदान होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस