शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:31 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार ही घोषणा देत भाजपा (BJP) रिंगणात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनीही ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार ही घोषणा देत भाजपा रिंगणात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनीही ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आज मावळमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल की, भाजपा ४०० जागा जिंकणार आहे, तेव्हा तुम्ही सांगा की, भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही. काल परवा एक घोषणा माझ्या कानावर आली की ‘दक्षिणेत साफ, उत्तरेत हाफ’, हेच मी तुम्हाला सांगतोय. चारशे पार चारशे पार जे कानावर येतंय, ते तुम्हीपण समजून घ्या. तुमच्यातून कुणी भाजपाला मतदान करणार आहे का? तुमच्यातून कुणी गद्दारांना मतदान करणार आहे का? तुमच्यातून कुणी महाराष्ट्रद्रोह्यांना मतदान करणार आहे का? याचं उत्तर नाही असं येतंय. म्हणजे मावळची जागा आपण जिंकणार, शिरूरची जागा आपण जिंकणार, पुण्याची जागा आपण जिंकणार, बारामतीची जागाही आपण जिंकणार, मग ह्या ४०० जागा येणार कुठून? असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, त्यावेळी एकनाथ शिंदे दाढी खाजवत यायचे. २० मे रोजीही मातोश्रीवर आले होते. आल्यावर ते उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की, मला धमकवलं जात आहे. तुरुंगात जाण्याचं आता माझं वय नाही. मला तुरुंगात टाकतील. तुम्ही काही तरी करा, भाजपासोबत चला, असं रडगाणं त्यांनी गायलं होतं. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची पॉलिसी आहे. तर खोटं बोला पण रडून बोला ही शिंदे गटाची पॉलिसी आहे. मी तुम्हाला लिहून देतो की जे ४० गद्दार आमदार गेले त्यांच्याविरुद्ध काही ना काही धमक्या होत्या. फायली होत्या. केसेस होत्या. आरोप होतो. तसेच जे गद्दार खासदार गेले. त्यात एक इकडचे पण होते. त्यांच्याबद्दल काही ना काही ऐकत असतो. कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबडी चोर. सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकी राहिलं तरी काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४maval-pcमावळAditya Thackreyआदित्य ठाकरेshrirang barneश्रीरंग बारणेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४