शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:31 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार ही घोषणा देत भाजपा (BJP) रिंगणात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनीही ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार ही घोषणा देत भाजपा रिंगणात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनीही ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आज मावळमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल की, भाजपा ४०० जागा जिंकणार आहे, तेव्हा तुम्ही सांगा की, भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही. काल परवा एक घोषणा माझ्या कानावर आली की ‘दक्षिणेत साफ, उत्तरेत हाफ’, हेच मी तुम्हाला सांगतोय. चारशे पार चारशे पार जे कानावर येतंय, ते तुम्हीपण समजून घ्या. तुमच्यातून कुणी भाजपाला मतदान करणार आहे का? तुमच्यातून कुणी गद्दारांना मतदान करणार आहे का? तुमच्यातून कुणी महाराष्ट्रद्रोह्यांना मतदान करणार आहे का? याचं उत्तर नाही असं येतंय. म्हणजे मावळची जागा आपण जिंकणार, शिरूरची जागा आपण जिंकणार, पुण्याची जागा आपण जिंकणार, बारामतीची जागाही आपण जिंकणार, मग ह्या ४०० जागा येणार कुठून? असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, त्यावेळी एकनाथ शिंदे दाढी खाजवत यायचे. २० मे रोजीही मातोश्रीवर आले होते. आल्यावर ते उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की, मला धमकवलं जात आहे. तुरुंगात जाण्याचं आता माझं वय नाही. मला तुरुंगात टाकतील. तुम्ही काही तरी करा, भाजपासोबत चला, असं रडगाणं त्यांनी गायलं होतं. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची पॉलिसी आहे. तर खोटं बोला पण रडून बोला ही शिंदे गटाची पॉलिसी आहे. मी तुम्हाला लिहून देतो की जे ४० गद्दार आमदार गेले त्यांच्याविरुद्ध काही ना काही धमक्या होत्या. फायली होत्या. केसेस होत्या. आरोप होतो. तसेच जे गद्दार खासदार गेले. त्यात एक इकडचे पण होते. त्यांच्याबद्दल काही ना काही ऐकत असतो. कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबडी चोर. सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकी राहिलं तरी काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४maval-pcमावळAditya Thackreyआदित्य ठाकरेshrirang barneश्रीरंग बारणेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४