शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट

By यदू जोशी | Updated: June 12, 2025 07:15 IST

Maharashtra Local Body Elections: राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी सद्यस्थितीत आहे त्याच एकसंधतेने निवडणुकीला सामोरे जाणार का हा प्रश्न कायम आहे.

- यदु जोशी मुंबई - राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी सद्यस्थितीत आहे त्याच एकसंधतेने निवडणुकीला सामोरे जाणार का हा प्रश्न कायम आहे. सत्तेतील तीन मित्र पक्षांमध्येच दिसत असलेल्या स्पर्धेमुळे महायुतीच्या, तर उद्धव-राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या शक्यतेने मविआच्या अस्तित्त्वावरील प्रश्नचिन्ह गडद होत आहे.

कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत नेत्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेली अडीच तीन वर्षे आणि स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधीच नसल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असेल.

मुंबईत वाढलेले १० लाख मतदार कोणाच्या बाजूने जाणार?नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत १० लाख मतदार वाढले होते. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू असताना आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत जर नवीन मतदार यादी आली तर विधानसभेला वाढलेले मतदार कमी होणार की त्यात आणखी वाढ होणार, यावरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे.  

दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास काय? ‘लोकांच्या मनात आहे ते होईल’ असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी राज यांना सोबत घेण्याचे संकेत दिलेले असताना राज आणि आदित्य यांना एकाच पोस्टरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवसैनिकांनी दिल्या आणि ते पोस्टर थेट सेनाभवनसमोर लावल्याने मनोमीलनाच्या चर्चेला वेग आला आहे. ठाकरे एकत्र आले तर मुंबई, ठाण्याच्या पट्ट्यात मराठी माणसांची मोट बांधली जाईल व त्याचा फटका बसू शकतो हे गृहीत धरून भाजपकडून प्लॅन बी तयार करण्यात येत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. हिंदी, गुजराथी, दाक्षिणात्यबहुल भागात अधिक जोर लावण्याची रणनीती आखून उद्धवसेनेचे काही मोहरे भाजप वा शिंदेसेनेच्या गळाला लावले जाण्याची शक्यता आहे.

दोन्ही पवार एकत्र आल्यास काय? अजित पवारांसोबत जाण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलेले होते. मात्र, याबाबत माध्यमांनी सुळे यांना विचारले असता, ‘त्यासाठी विशिष्ट टाइमलाइन नाही,’ असे त्या म्हणाल्या. टाइमलाइन नाही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी दोघे एकत्र येऊ शकतात, असाही या विधानाचा अर्थ काढला जात आहे. तसे झाल्यास मविआचे अस्तित्व धोक्यात येईल. शरद पवार यांनी मात्र विचारांबरोबर राहा, असे आवाहन पक्षजनांना केल्याने त्यांचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि पर्यायाने भाजपसोबत जाणार नाही, असाही घेतला जात आहे.  

नेते म्हणतात पण खाली काय? आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असले तरी ठिकठिकाणची परिस्थिती त्याच्या विपरीत आहे. अनेक ठिकाणी सामंजस्याने जागावाटप व तिकीटवाटप महायुतीला अशक्य आहे. त्यातच भाजपने शिंदेंच्या प्रभावपट्ट्यातील विरोधक आपल्याकडे खेचणे सुरू केले आहे. तर शिंदे हे भाजप आणि अजित पवारांच्या प्रभावपट्ट्यातील त्यांच्या विरोधकांना आपल्या पक्षात आणत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा