शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाराष्ट्र केसरी स्पर्धा: मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’! विजयापेक्षा पराभवाचीच चर्चा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:32 IST

मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली. 

उमेश गो. जाधव पुणे : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत मानाची गदा उंचावली. मात्र, या स्पर्धेनंतर खरी चर्चा रंगली ती सिकंदर शेखच्या पराभवाचीच. तो हरला की हरवला गेला, असा संशयाचा सूर सोशल मीडियावर आहे. यावरून मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’ असेच चित्र दिसत आहे.

सिकंदरने नुकताच एक व्हिडीओ करून सांगितले की, “मी हरलो की हरवला गेलो याबाबत चर्चा करणे थांबवा. यंदा नाही तर पुढील वर्षी मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली. महेंद्र गायकवाड विरुद्ध किताबाच्या उपांत्य लढतीत पहिल्याच फेरीत सिकंदरने ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, सिकंदरला आतली टांग लावून बाहेर पाडणाऱ्या महेंद्रला चार गुण दिल्याने सिकंदरचा पराभव झाला. 

खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहीर करण्याचा प्रयत्न का केला? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत.  सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा प्रवास रोमहर्षक आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून पोलिसांत तक्रार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोथरूड येथे शनिवारी झाली. या स्पर्धेतील अंतिम फेरीमधील सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड या कुस्तीमध्ये  मारुती सातव यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले. या कुस्तीतील एका डावामध्ये महेंद्र गायकवाड याला ४ गुण दिले. त्यावर मोठा वाद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी मारुती सातव यांना संग्राम कांबळे या नावाने एकाचा फोन आला. त्याने मारुती यांना धमकी दिली. हे संभाषण सोशल मीडियावर प्रसारित करून स्वत:च्या रिव्हाॅल्व्हरमध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला. सातव यांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत असता तर ती कुस्ती अतिशय रंगतदार झाली असती. उपांत्य लढतीत गुण गमावल्यावरही त्याने पंचांशी हुज्जत घातली नाही. भविष्यात तो नक्कीच गदा उंचावेल. - अमोल बुचडे, रुस्तुम ए हिंद

सिकंदरवर कोणताही अन्याय झालेला नाही. कुस्तीतील नियमांच्या अज्ञानामुळे असे आरोप होत आहेत. सिकंदर धोकादायक स्थितीत पडल्यामुळेच महेंद्रला चार गुण देण्यात आले. अशावेळी दोन नाही तर चार गुण दिले जातात. - पंच समिती, महाराष्ट्र केसरी

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा