शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

महाराष्ट्र केसरी स्पर्धा: मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’! विजयापेक्षा पराभवाचीच चर्चा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:32 IST

मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली. 

उमेश गो. जाधव पुणे : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत मानाची गदा उंचावली. मात्र, या स्पर्धेनंतर खरी चर्चा रंगली ती सिकंदर शेखच्या पराभवाचीच. तो हरला की हरवला गेला, असा संशयाचा सूर सोशल मीडियावर आहे. यावरून मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’ असेच चित्र दिसत आहे.

सिकंदरने नुकताच एक व्हिडीओ करून सांगितले की, “मी हरलो की हरवला गेलो याबाबत चर्चा करणे थांबवा. यंदा नाही तर पुढील वर्षी मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली. महेंद्र गायकवाड विरुद्ध किताबाच्या उपांत्य लढतीत पहिल्याच फेरीत सिकंदरने ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, सिकंदरला आतली टांग लावून बाहेर पाडणाऱ्या महेंद्रला चार गुण दिल्याने सिकंदरचा पराभव झाला. 

खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहीर करण्याचा प्रयत्न का केला? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत.  सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा प्रवास रोमहर्षक आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून पोलिसांत तक्रार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोथरूड येथे शनिवारी झाली. या स्पर्धेतील अंतिम फेरीमधील सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड या कुस्तीमध्ये  मारुती सातव यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले. या कुस्तीतील एका डावामध्ये महेंद्र गायकवाड याला ४ गुण दिले. त्यावर मोठा वाद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी मारुती सातव यांना संग्राम कांबळे या नावाने एकाचा फोन आला. त्याने मारुती यांना धमकी दिली. हे संभाषण सोशल मीडियावर प्रसारित करून स्वत:च्या रिव्हाॅल्व्हरमध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला. सातव यांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत असता तर ती कुस्ती अतिशय रंगतदार झाली असती. उपांत्य लढतीत गुण गमावल्यावरही त्याने पंचांशी हुज्जत घातली नाही. भविष्यात तो नक्कीच गदा उंचावेल. - अमोल बुचडे, रुस्तुम ए हिंद

सिकंदरवर कोणताही अन्याय झालेला नाही. कुस्तीतील नियमांच्या अज्ञानामुळे असे आरोप होत आहेत. सिकंदर धोकादायक स्थितीत पडल्यामुळेच महेंद्रला चार गुण देण्यात आले. अशावेळी दोन नाही तर चार गुण दिले जातात. - पंच समिती, महाराष्ट्र केसरी

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा