शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई, सीमाप्रश्नावर सकारात्मक मध्यस्थी झाली तर...; राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:29 IST

न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं पण २०-२५ लाख मराठी माणसं आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर मध्यस्थी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी करावी. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात दोन्ही राज्यात भाजपा मुख्यमंत्री आहेत. सीमाभाग संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार केंद्राचा आहे. बेळगाव, कारवार, निपाणी येथे राज्य पोलीस दल हटवून तिथे केंद्रीय फौजफाटा पाठवावा. गृहमंत्री मध्यस्थी करत असतील आणि त्यातून काही सकारात्मक निर्णय होणार असेल तर त्यावर टीका करण्याचं कारण नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, गेल्या ७० वर्षापासून मराठी माणसांचा छळ सीमाभागात सुरू आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत. शहांची सासरवाडी कोल्हापूरला त्याचे चटके बसतायेत. त्यामुळे त्यांना याची कल्पना असेल. न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं पण २०-२५ लाख मराठी माणसं आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. सीमाप्रश्न किंवा महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार यावर वारंवार कोर्टात तारखा पडताय त्यामुळे शंका होते. फक्त सीमाभागाचा विषय नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगतायेत. विधिमंडळात याबाबत सरकारला जाब विचारलं जाईल असंही राऊतांनी सांगितले. 

देशाच्या सीमेचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची  ३०० चिनी सैन्य तवांगमध्ये घुसले त्यांना परत पाठवले ठीक परंतु वारंवार चीन भारतात घुसण्याचा प्रयत्न करतंय त्याचे खापर पंडित नेहरूवर फोडले जाते. गेल्या ८ वर्षापासून तुमचं सरकार आहे. खापर फोडण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे पाहावं. सीमाचं रक्षण करण्याची जबाबदारी आत्ताच्या सरकारची आहे असं सांगत संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत खलबतंमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर राज्याची भूमिका स्पष्ट करू असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सीमावादावर काय तोडगा निघतो हे पाहणं गरजेचे आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा