शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

बोम्मई रोज महाराष्ट्रावर थुंकतायेत, भाजपा महाराष्ट्रद्रोह करतेय; राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:43 IST

माझ्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिका संस्था देतेय. तो हल्ला माझ्यावरचा नसून महाराष्ट्रावरचा आहे असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपतींबाबत अपशब्द वापरतात. भाजपाने धिक्कारही केला नाही. कॅबिनेटने राज्यपालांच्या निषेधाचा प्रस्तावही आणला नाही. तुम्ही काहीही केले म्हणजे तुम्ही बिनकामाचे आहात.  छत्रपतींबद्दल काहीही बोलणं महाराष्ट्राने सहन करायचे का? छत्रपतींचा अपमान केल्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाकत असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अचानक उफाळून कसा आला? बोम्मई रोज महाराष्ट्राच्या तोंडावर थुंकतायेत. त्यावर आम्ही आवाज उठवला त्यांना जेलमध्ये जाण्याची धमकी देतायेत. हा महाराष्ट्रद्रोह आहे अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर घणाघात केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, या देशात आणि महाराष्ट्रात शिवसेनेने कुणालाही भडकवण्याचं काम केले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमचे मित्र पक्ष यांची हीच भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपाल करतायेत. भाजपा मंत्री करताये. राष्ट्रीय प्रवक्ते करतायेत त्याबद्दल आम्ही आवाज उठवला म्हणजे आम्ही लोकांना भडकवतायेत असं होत नाही. आम्ही भडकवत आहे असं बोलणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. कर्नाटकाकडून महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत त्यावर बोलणं भडकवणं आहे का? भाजपानं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागायला हवी असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत माझ्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिका संस्था देतेय. तो हल्ला माझ्यावरचा नसून महाराष्ट्रावरचा आहे. तुम्ही बेळगावात जाऊ शकत होता. ते जतमध्ये घुसतायेत, मुंबईत घुसतायेत आणि सरकार गप्प बसून आहे. जी भाषा सरकारचे नेते वापरतायेत तीच कन्नड रक्षक वेदिका वापरतेय असंही राऊतांनी म्हटलं. 

भाजपानं काय म्हटलं होतं? संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिला होता. मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. 

संजय राऊत यांनी आव्हान देऊ नये, राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये, अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे संजय राऊत यांनी बोलू नये. मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल असं बावनकुळेंनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाKarnatakकर्नाटक