शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

'अजित दादांनी चूक स्वीकारली तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 14:48 IST

अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

मुंबई : भाजपसोबत युती तोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्याने सत्तास्थापनेचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस आधीच अजित पवारांनी राजीनामा देऊन,घरवापसी केली. तर अजित दादांनी ही चूक स्वीकारली असून, शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं असल्याचे नवाब मलीक म्हणाले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असतानाच भाजपानं राजकीय चमत्कारच घडवला. शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याच पत्र देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीचं अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन घरवापसी केली. त्यामुळे त्यांनी केलेल्या बंडखोरीबद्दल पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणार का ? अशी चर्चा पाहायला मिळत होती. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक म्हणाले की, अजित पवारांनी आपली चूक स्वीकारली असून त्यांची घर वापसी झाली आहे. तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं असल्याचे मलीक म्हणाले. तर 'सुबह का भूला शाम को घर आ जाये तो, उसे भुला नही कहते' असे सुद्धा मलिक म्हणाले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपचा सुद्धा समाचार घेतला. भाजप हा कधीच मोठा पक्ष नव्हता. त्यांना सत्तेची सूज आली होती. मात्र आता सत्ता गेल्याने ही सूज हळूहळू नक्कीच कमी होईल असा,खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी मलीक बोलत होते.