शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 21:02 IST

आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमधील दरी दिवसागणिक रुंदावत आहेत. शिवसेनेनं एनडीएमधून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन पक्षांमध्ये समेट घडवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबद्दलची माहिती आमदारांच्या बैठकीत दिली. भाजपा आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी संघातील काहींनी प्रयत्न केले. मात्र मी त्यात फारसा रस दाखवला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेनं सर्व आमदारांना मुंबईतील ललित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. या आमदारांची आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आमदारांशी संवाद साधत सरकार आपलंच येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्धव यांनी संघाचाही उल्लेख केला. 'भाजपाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी संघानं पुढाकार घेत संपर्क साधला. मात्र आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं. शरद पवार आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच सरकार येईल असं मी संघाला सांगितलं', असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील आपण भाजपासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नसल्याचं म्हटलं. भाजपासोबत न जाता शिवसेना आणि काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला आहे. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करेल. अजित पवारांचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ