शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 21:02 IST

आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमधील दरी दिवसागणिक रुंदावत आहेत. शिवसेनेनं एनडीएमधून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन पक्षांमध्ये समेट घडवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबद्दलची माहिती आमदारांच्या बैठकीत दिली. भाजपा आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी संघातील काहींनी प्रयत्न केले. मात्र मी त्यात फारसा रस दाखवला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेनं सर्व आमदारांना मुंबईतील ललित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. या आमदारांची आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आमदारांशी संवाद साधत सरकार आपलंच येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्धव यांनी संघाचाही उल्लेख केला. 'भाजपाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी संघानं पुढाकार घेत संपर्क साधला. मात्र आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं. शरद पवार आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच सरकार येईल असं मी संघाला सांगितलं', असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील आपण भाजपासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नसल्याचं म्हटलं. भाजपासोबत न जाता शिवसेना आणि काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला आहे. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करेल. अजित पवारांचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ