शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: समन्वयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:18 IST

तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे शिवसेनेशी रविवारपासून चर्चेला प्रारंभ करणार

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्रात बिगरभाजप सरकार स्थापण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसने आपापल्या प्रत्येकी पाच अशा दहा नेत्यांची एक समन्वय समिती नेमली आहे. त्याचप्रमाणे, तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे शिवसेनेशी रविवारपासून चर्चेला प्रारंभ करतील.राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी असली, तरी आमचे स्वतंत्र जाहीरनामे होते. त्यामुळे आधी आम्ही आमचा किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यानंतर, शिवसेनेशी चर्चा करून तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविणार आहोत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे व अन्य एक नेता तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे व अन्य एक जण यांचा या दोन पक्षांच्या समन्वय समितीत समावेश असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा किमान समान कार्यक्रम येत्या तीन दिवसांत तयार करण्याचे व त्यांतर शिवसेनेशी तीन पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाविषयी बोलणी करण्याचे सोनिया गांधी व शरद पवार यांच्या बैठकीत ठरविण्यात आले. या घडामोडींमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला अयोध्या दौरा रद्द केला आहे. तिथून ते दिल्लीला जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार होते. तोही बेत आता रद्द झाला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस