शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:20 IST

पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर भाजप ठाम; संजय राऊतांनीही आठवलेंना सुनावले

मुंबई : भाजप-शिवसेनेचेच सरकार राज्यात व्हावे आणि भाजपने तीन वर्षांसाठी व शिवसेनेने दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली खरी पण शिवसेनेचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, आता राज्यमंत्री आहात, कॅबिनेट मंत्री कसे व्हाल यासाठी प्रयत्न करा, असा टोला शिवसनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आठवले यांना हाणला. दुसरीकडे अशा कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चेचा प्रश्नच नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.आठवले यांनी काल दिल्लीत बोलताना तीन-दोन वर्षांच्या फॉर्म्युल्याबाबत आपले संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असून यावर भाजपशी चर्चेची तयारी त्यांनी दर्शविली असल्याचा दावा केला होता. राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्या बाबत इन्कार केला. ते म्हणाले की, शिवसेनेच्याच नेतृत्वातील सरकार येईल व पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल.भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शिवसेनेला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही त्या बाबतची भूमिका आधीही स्पष्ट केलेली आहे. उद्या युतीचे सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा झाली तरी मुख्यमंत्रिपदावर तडजोड स्वीकारायची नाही, असे भाजपने ठरविले आहे. हा मुद्दा केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नाही. आज शिवसेनेसमोर भाजप झुकला तर एनडीएतील इतर घटकपक्ष त्या-त्या राज्यांमध्ये भाजपला अशाच पद्धतीने सत्तेत वाटा मागतील. भाजपला ते परवडणारे नाही. मित्रपक्षांच्या प्रत्येक मागणीसमोर भाजप झुकणार नाही, असा संदेश या महाराष्ट्राच्या निमित्ताने भाजप एनडीएतील मित्रपक्षांना देऊ इच्छितो.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार होणार नसेल आणि शिवसेना भाजपसोबत येण्यास तयार असेल तर शिवसेनेला सन्मानाने सोबत घेण्याची आमची तयारी असेल. महाशिवआघाडीबाबत बरेच पुढे निघून गेल्यानंतर यू टर्न घेत भाजपबरोबर जायचे असेल तर त्यासाठी काही कारणे शिवसेनेला द्यावी लागतील. अशावेळी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेच्या बचावासाठी समोर केला जाईल याशिवाय बचावाचे काही मुद्दे आम्हीही सुचवू, असे हा नेता म्हणाला....तर झाले गेले ते विसरून जाण्याची भूमिका?शिवसेनेने इतकी कडवट टीका केल्यानंतरही त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची भाजपची भूमिका दिसते. राज्याला स्थिर सरकार युतीच देऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी झाले गेले ते विसरून जाण्याची भूमिका घेतली जाऊ शकते, असे मत भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत