शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:20 IST

पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर भाजप ठाम; संजय राऊतांनीही आठवलेंना सुनावले

मुंबई : भाजप-शिवसेनेचेच सरकार राज्यात व्हावे आणि भाजपने तीन वर्षांसाठी व शिवसेनेने दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली खरी पण शिवसेनेचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, आता राज्यमंत्री आहात, कॅबिनेट मंत्री कसे व्हाल यासाठी प्रयत्न करा, असा टोला शिवसनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आठवले यांना हाणला. दुसरीकडे अशा कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चेचा प्रश्नच नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.आठवले यांनी काल दिल्लीत बोलताना तीन-दोन वर्षांच्या फॉर्म्युल्याबाबत आपले संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असून यावर भाजपशी चर्चेची तयारी त्यांनी दर्शविली असल्याचा दावा केला होता. राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्या बाबत इन्कार केला. ते म्हणाले की, शिवसेनेच्याच नेतृत्वातील सरकार येईल व पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल.भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शिवसेनेला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही त्या बाबतची भूमिका आधीही स्पष्ट केलेली आहे. उद्या युतीचे सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा झाली तरी मुख्यमंत्रिपदावर तडजोड स्वीकारायची नाही, असे भाजपने ठरविले आहे. हा मुद्दा केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नाही. आज शिवसेनेसमोर भाजप झुकला तर एनडीएतील इतर घटकपक्ष त्या-त्या राज्यांमध्ये भाजपला अशाच पद्धतीने सत्तेत वाटा मागतील. भाजपला ते परवडणारे नाही. मित्रपक्षांच्या प्रत्येक मागणीसमोर भाजप झुकणार नाही, असा संदेश या महाराष्ट्राच्या निमित्ताने भाजप एनडीएतील मित्रपक्षांना देऊ इच्छितो.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार होणार नसेल आणि शिवसेना भाजपसोबत येण्यास तयार असेल तर शिवसेनेला सन्मानाने सोबत घेण्याची आमची तयारी असेल. महाशिवआघाडीबाबत बरेच पुढे निघून गेल्यानंतर यू टर्न घेत भाजपबरोबर जायचे असेल तर त्यासाठी काही कारणे शिवसेनेला द्यावी लागतील. अशावेळी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेच्या बचावासाठी समोर केला जाईल याशिवाय बचावाचे काही मुद्दे आम्हीही सुचवू, असे हा नेता म्हणाला....तर झाले गेले ते विसरून जाण्याची भूमिका?शिवसेनेने इतकी कडवट टीका केल्यानंतरही त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची भाजपची भूमिका दिसते. राज्याला स्थिर सरकार युतीच देऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी झाले गेले ते विसरून जाण्याची भूमिका घेतली जाऊ शकते, असे मत भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत