शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 18:17 IST

आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे.

मुंबईः गेल्या महिन्याभरापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. ठाकरे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. ठाकरे विश्वासदर्शक ठराव मांडत असताना भाजपानं सभात्याग केला आहे. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. परंतु युवा सेना प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाच्या गोंधळावर काहीही बोलण्याचं टाळलं.एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं त्यांना भाजपानं घातलेल्या गोंधळासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, आता लक्ष महाराष्ट्राच्या विकासावर आहे, आता कामं सुरू झालेली आहेत, इतर गोष्टींवर मला बोलायचं नाही. तसेच आता मुख्यमंत्री सांगतील आणि कॅबिनेट ठरवत जाईल, असं सूचक विधानही आदित्य ठाकरेंनी केलं आहे. ज्यांनी झाडांची कत्तल केली, त्यांच्यासंदर्भात एक एक पाऊल सावकाश उचलू. कामं आता सुरू झालेली आहेत, मुंबईसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, असंही त्यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची स्तुती केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी काल आरे कारशेडला स्थगिती दिली असली तरी मेट्रोचं काम सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मागील राज्य सरकारच्या कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. दिलेला शब्द पाळणं हे आमचं तत्त्व असल्याचं म्हणत आरे कारशेडला स्थगिती दिली होती. मेट्रो कारशेडच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यानंतरच पुढे काय करायचं हे ठरवलं जाईल. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर टीका केलेली होती.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAarey Coloneyआरे