शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 18:17 IST

आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे.

मुंबईः गेल्या महिन्याभरापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. ठाकरे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. ठाकरे विश्वासदर्शक ठराव मांडत असताना भाजपानं सभात्याग केला आहे. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. परंतु युवा सेना प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाच्या गोंधळावर काहीही बोलण्याचं टाळलं.एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं त्यांना भाजपानं घातलेल्या गोंधळासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, आता लक्ष महाराष्ट्राच्या विकासावर आहे, आता कामं सुरू झालेली आहेत, इतर गोष्टींवर मला बोलायचं नाही. तसेच आता मुख्यमंत्री सांगतील आणि कॅबिनेट ठरवत जाईल, असं सूचक विधानही आदित्य ठाकरेंनी केलं आहे. ज्यांनी झाडांची कत्तल केली, त्यांच्यासंदर्भात एक एक पाऊल सावकाश उचलू. कामं आता सुरू झालेली आहेत, मुंबईसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, असंही त्यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची स्तुती केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी काल आरे कारशेडला स्थगिती दिली असली तरी मेट्रोचं काम सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मागील राज्य सरकारच्या कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. दिलेला शब्द पाळणं हे आमचं तत्त्व असल्याचं म्हणत आरे कारशेडला स्थगिती दिली होती. मेट्रो कारशेडच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यानंतरच पुढे काय करायचं हे ठरवलं जाईल. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर टीका केलेली होती.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAarey Coloneyआरे