शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Government : धोकेबाजांना जागा दाखवूच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 02:18 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी शब्दच दिला नव्हता, असे सांगून मला खोटे ठरविणाऱ्या धोकेबाजांना धडा शिकवायचाच असून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे अटळ आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.शिवसेना आमदारांची मातोश्रीवर शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत बोलताना उद्धव म्हणाले, ‘हे आपल्याला सोडून जातील कुठे,यांना आपल्याशिवाय पर्याय नाही’ असे वाटणाºया भाजपने आम्हाला अनेक वर्षे गृहित धरले. शिवसेनेची त्यांच्यासोबत फरपट झाली. नितीशकुमार यांच्याबरोबर भाजप सोईनुसार युती तोडते आणि नंतर करते, त्यांना मेहबुबा मुफ्तीही सत्तेसाठी चालतात मग आमचे वावडे कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.फडणवीसांनी मला खोटे ठरविले‘तुम्ही मला इतकी वर्षे पाहत आहात, मी कधीच खोटे बोललेलो नाही, तो माझा संस्कार नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी मलाच खोटे ठरविले. आता त्यांना धोकेबाजांना जागा दाखविण्याची वेळआली आहे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याइतपत आमच्याकडे संख्याबळ नाही. अशावेळी कोणाची ना कोणाची मदत घेणे आवश्यक होते. आम्हाला गृहित धरणाऱ्यांच्या मागे जाण्यापेक्षा आम्ही नवीन मित्र शोधले, असे उद्धव म्हणाले.गेली तीस वर्षे भाजपचे आम्ही मित्र होतो पण इतक्या जुन्या मित्राची त्यांनी किंमत ठेवली नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेबाबत विश्वासात घेण्याची गरजही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना वाटली नाही, अशी टीका उद्धव यांनी बैठकीत केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा