शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:49 IST

 शेतीसाठी मातीवर रॉयल्टीची आकारणी नाही, ओल्या दुष्काळाचे सर्व निकष लागू करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अतिवृष्टी झाली हे निश्चित करण्यासाठीचे जे निकष आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांमध्ये पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. यासह मदतीचे विविध निकष बदलण्याबाबतचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने तयार केले असून राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्याबाबत काय निर्णय होणार याविषयी उत्सुकता आहे.

 एखाद्या गाव परिसरात अतिवृष्टी झाली का हे ठरवण्यासाठी सरकारचे काही निकष आहेत. त्यात प्रामुख्याने एकूण किमान ६५ मिलिमीटर किंवा पाच दिवसांपर्यंत दररोज किमान १० मिलिमीटर पाऊस पडलेला असावा हा महत्त्वाचा निकष आहे. मात्र  एवढा पाऊस पडलेला नसतानाही अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. कारण अन्य ठिकाणच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी त्या गावांमध्ये शिरले आणि अतोनात नुकसान झाले. त्यामुळे प्रत्यक्ष त्या गावात किती पाऊस झाला हा निकष बाजूला ठेवावा असे मदत व पुनर्वसन विभागाने प्रस्तावित केले आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत झाला तर अनेकांना दिलासा मिळणार आहे.

११ हजार विहिरी बुजून गेल्या ओल्या किंवा कोरड्या दुष्काळात राज्य सरकार केंद्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) तरतुदीनुसार मदत देत असते. अलीकडच्या अतिवृष्टीमध्ये ११ हजार विहिरी या पूर्णपणेबुजून गेल्या.आता सध्याच्या निकषांनुसार चालायचे तर या विहिरींच्या नुकसानीसाठी मदत देता येणार नाही. पण तीद्यावी असा आग्रहदेखील मदत पुनर्वसन विभागाने धरला आहे.

विविध निर्णयांची शक्यता ओला दुष्काळ असताना ज्या पद्धतीने मदत केली जाते ती सर्व मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन, विद्यार्थ्यांना शुल्कमाफी आदी निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनानुसार विविध कंपन्यांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरूपात मदत दिली आहे. त्यात आरोग्य किट आणि शालेय बॅग, कंपास आदींचा समावेश आहे. त्याचे वितरण दोन-तीन दिवसात सुरू होईल. 

जमिनीचा मोबदला वाढणार दुरुस्त न होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार तर खरवडून निघालेल्या जमिनीसाठी  हेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा नियम आहे. मात्र तो बदलावा आणि दोन्हींसाठी एकाच स्वरूपाची मदत द्यावी आणि मदतीतदेखील वाढ करावी असेही प्रस्तावित असल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Revise Rainfall Criteria, Aid Farmers, Wells' Relief Proposed.

Web Summary : Maharashtra likely to ease rainfall criteria for flood relief in Marathwada. Buried wells may get aid. Compensation for land damage is also expected to increase.
टॅग्स :Farmerशेतकरीfloodपूर