शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Flood: कोसळधारांना ‘ब्रेक’ लागेना! औरंगाबादेत अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मिमी बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 07:21 IST

पुराचे थैमानही कायमच, गोदाकाठच्या ४३ गावांना अलर्ट देण्यात आला अहे

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात पावसाचे धूमशान सुरूच असून, परभणी, पैठण, बीड, वाशिम, नगर येथे शनिवारी पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटे ३.२५ वाजता ढगफुटीपेक्षाही अधिक वेगाने अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मिलीमीटर पाऊस कोसळला. यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सुखना नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गाव तसेच शहरात शिरल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहेत. 

गोदाकाठच्या ४३ गावांना अलर्ट देण्यात आला अहे.  शोध बचाव पथक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात गारपीट झाल्याने अडाण, उमा नदीला पूर आला. शेतातील साेयाबीनच्या गंज्या वाहून गेल्याने त्यांचे यावर्षी आलेले पीक हातून गेले आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारीही चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पावसाने धुवाधार हजेरी लावली. यामुळे चार मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील कन्नड तालुक्यातील वाकद येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात सुनील चिकटे हा तरुण वाहून गेला.

पंचनाम्यासाठी पैसे मागणे गंभीर, कारवाई करा - फडणवीसआतापर्यंत पंचनामे झालेले नसून, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी ५०० रुपयांची मागणी करीत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वाशिम येथे मांडली. पीकविमा कंपन्यांनी शासकीय पंचनामे मान्य करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे मागणे गंभीर बाब असून, अशा अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी हिंगोलीत केली.

 तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्याअतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्याने योगेश खांडवे (वय २५) या शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी (जि. बीड) येथे घडली.  अमरावती येथे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला कंटाळून संजय धनराज तेलंग (४०) या अल्पभूधारक शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. औसा (जि. लातूर) येथील शंकर माळी या शेतकऱ्यानेही गळफास घेतला.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादfloodपूर