शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Maharashtra Flood: कोसळधारांना ‘ब्रेक’ लागेना! औरंगाबादेत अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मिमी बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 07:21 IST

पुराचे थैमानही कायमच, गोदाकाठच्या ४३ गावांना अलर्ट देण्यात आला अहे

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात पावसाचे धूमशान सुरूच असून, परभणी, पैठण, बीड, वाशिम, नगर येथे शनिवारी पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटे ३.२५ वाजता ढगफुटीपेक्षाही अधिक वेगाने अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मिलीमीटर पाऊस कोसळला. यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सुखना नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गाव तसेच शहरात शिरल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहेत. 

गोदाकाठच्या ४३ गावांना अलर्ट देण्यात आला अहे.  शोध बचाव पथक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात गारपीट झाल्याने अडाण, उमा नदीला पूर आला. शेतातील साेयाबीनच्या गंज्या वाहून गेल्याने त्यांचे यावर्षी आलेले पीक हातून गेले आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारीही चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पावसाने धुवाधार हजेरी लावली. यामुळे चार मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील कन्नड तालुक्यातील वाकद येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात सुनील चिकटे हा तरुण वाहून गेला.

पंचनाम्यासाठी पैसे मागणे गंभीर, कारवाई करा - फडणवीसआतापर्यंत पंचनामे झालेले नसून, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी ५०० रुपयांची मागणी करीत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वाशिम येथे मांडली. पीकविमा कंपन्यांनी शासकीय पंचनामे मान्य करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे मागणे गंभीर बाब असून, अशा अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी हिंगोलीत केली.

 तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्याअतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्याने योगेश खांडवे (वय २५) या शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी (जि. बीड) येथे घडली.  अमरावती येथे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला कंटाळून संजय धनराज तेलंग (४०) या अल्पभूधारक शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. औसा (जि. लातूर) येथील शंकर माळी या शेतकऱ्यानेही गळफास घेतला.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादfloodपूर