शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

Maharashtra Flood: कोसळधारांना ‘ब्रेक’ लागेना! औरंगाबादेत अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मिमी बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 07:21 IST

पुराचे थैमानही कायमच, गोदाकाठच्या ४३ गावांना अलर्ट देण्यात आला अहे

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात पावसाचे धूमशान सुरूच असून, परभणी, पैठण, बीड, वाशिम, नगर येथे शनिवारी पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटे ३.२५ वाजता ढगफुटीपेक्षाही अधिक वेगाने अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मिलीमीटर पाऊस कोसळला. यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सुखना नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गाव तसेच शहरात शिरल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहेत. 

गोदाकाठच्या ४३ गावांना अलर्ट देण्यात आला अहे.  शोध बचाव पथक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात गारपीट झाल्याने अडाण, उमा नदीला पूर आला. शेतातील साेयाबीनच्या गंज्या वाहून गेल्याने त्यांचे यावर्षी आलेले पीक हातून गेले आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारीही चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पावसाने धुवाधार हजेरी लावली. यामुळे चार मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील कन्नड तालुक्यातील वाकद येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात सुनील चिकटे हा तरुण वाहून गेला.

पंचनाम्यासाठी पैसे मागणे गंभीर, कारवाई करा - फडणवीसआतापर्यंत पंचनामे झालेले नसून, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी ५०० रुपयांची मागणी करीत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वाशिम येथे मांडली. पीकविमा कंपन्यांनी शासकीय पंचनामे मान्य करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे मागणे गंभीर बाब असून, अशा अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी हिंगोलीत केली.

 तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्याअतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्याने योगेश खांडवे (वय २५) या शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी (जि. बीड) येथे घडली.  अमरावती येथे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला कंटाळून संजय धनराज तेलंग (४०) या अल्पभूधारक शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. औसा (जि. लातूर) येथील शंकर माळी या शेतकऱ्यानेही गळफास घेतला.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादfloodपूर