शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 12:54 IST

उत्तर प्रदेश दुसºया क्रमांकावर; महाराष्ट्रात ९३ प्रकल्पांत सुरू आहे इथेनॉल निर्मितीचे

ठळक मुद्देदेशभरातील इथेनॉल प्रकल्पांनी १४ मे पर्यंत ३९ टक्के इथेनॉलचा पुरवठा केलामहाराष्टÑातील दोन साखर कारखान्यांनी थेट रसापासून इथेनॉल तयार केलेसंपूर्ण देशभरातून इथेनॉलची निर्मिती होत असली तरी महाराष्ट्र आज तरी देशात प्रथम क्रमांकावर आहे

सोलापूर: साखर उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र इथेनॉल निर्मिती व पुरवठ्यात देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात ९३ प्रकल्पातून इथेनॉल निर्मिती केली जात आहे. दुसºया क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. केंद्र शासनाने इथेनॉल खरेदीचे दर वाढविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना चालना मिळाली आहे.

केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आघाडीचे केंद्रात सरकार असताना इथेनॉल खरेदीदर २७ रुपये इतका होता. फारच कमी दर असल्याने साखर कारखाने व स्वतंत्र इथेनॉल प्रकल्पांना इथेनॉल तयार करणे परवडत नव्हते. त्यामुळे देशभरातील सर्वच इथेनॉल प्रकल्प बंद ठेवावे लागले होते. देशात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल उद्योगासाठी खरेदीदर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात इथेनॉल प्रकल्पांना चालना मिळाली.

महाराष्ट्रत सध्या ९३ प्रकल्पातून इथेनॉल निर्मिती सुरू आहे. देशातच इथेनॉल निर्मितीला वेग आला असून संपर्ण देशात ३२९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम कंपन्यांनी केली होती. प्रत्यक्षात ३१३ कोटींचे टेंडर निघाले. प्रत्यक्षात २६८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल पुरवठादारांना दिले होते. 

यावर्षी देशभरात डिसेंबरनंतर इथेनॉल निर्मितीला वेग आला. १४ मे पर्यंत देशभरात पेट्रोलियम कंपन्यांना १०४ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक इथेनॉल पुरवठा महाराष्ट्रतून झाला असून दुसºया क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. कर्नाटक राज्य ११ कोटी ५३ लाख लिटरचा पुरवठा करून तिसºया क्रमांकावर आहे.

राज्यातील ९३ प्रकल्पांचा ४३ टक्के पुरवठादेशभरातील २१ राज्यांतील इथेनॉल प्रकल्पांनी यावर्षी इथेनॉल पुरवठ्याच्या निविदा भरल्या होत्या. संपूर्ण देशभरातून इथेनॉलची निर्मिती होत असली तरी महाराष्ट्र आज तरी देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रतील आॅईल कंपन्यांनी ४२ कोटी ६ लाख ४२ हजार लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा काढल्या होत्या. प्रत्यक्षात ८२ कोटी ५ लाख ३९ हजार लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी टेंडर टाकले. महाराष्ट्रतील साखर कारखाने व इथेनॉल प्रकल्पांनी शेजारच्या राज्यातही इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा भरल्या. प्रत्यक्षात ४४ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश मिळाले. राज्यातील ९३ प्रकल्पांनी १४ मे पर्यंत १९ कोटी ६ लाख लिटर म्हणजे ४३ टक्के इथेनॉल पुरवठा केला आहे.

देशभरात ३९ तर उत्तर प्रदेशातून ४० टक्के

  • - देशभरातील इथेनॉल प्रकल्पांनी १४ मे पर्यंत ३९ टक्के इथेनॉलचा पुरवठा केला असून उत्तर प्रदेशातून ४० टक्के इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांनी खरेदी केले आहे. उत्तर प्रदेशातून ४४ लाख ८९ हजार लिटर इथेनॉल पुरवठा होणार असून १८ लाख ४ हजार लिटरचा पुरवठा झाला आहे. 
  • - कर्नाटकातून २९ लाख ४ हजार लिटरचा पुरवठा करावयाचा असून आतापर्यंत ११ लाख ५३ हजार लिटरचा पुरवठा झाला आहे. 
  • - सी. हेव्ही मोलॅसेसपासून तयार होणारे इथेनॉल प्रति लिटर ४३ रुपये ४६ पैसे, बी. हेव्ही मोलॅसेसपासून तयार होणारे इथेनॉल ५२ रुपये ४३ पैसे व थेट रसापासून तयार होणारे इथेनॉल ५९ रुपये १९ पैसे, या दराने खरेदी केली जाते. 

साखर व इथेनॉलच्या विक्रीतून जवळपास सारखेच पैसे येतात. मात्र, सध्या साखरेला उठाव नसल्याने साखर तयार करणारे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. इथेनॉलला मागणी असल्याने पुरवठा केल्यानंतर पैसे मिळतात. महाराष्टÑातील दोन साखर कारखान्यांनी थेट रसापासून इथेनॉल तयार केले आहे.- महेश देशमुख, संचालक, इस्मा महाराष्ट्र 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेIndiaभारतNitin Gadkariनितीन गडकरीPetrolपेट्रोल