शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्र तापला; केरळात सर्वाधिक कमाल तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 01:41 IST

उत्तर-मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान अद्याप खालीच

मुंबई : देशात १ मार्चपासून मान्सूनपूर्व हंगाम सुरू झाला आहे. परिणामी, देशाच्या दक्षिण आणि मध्य भारतातून तापमानवाढीस सुरुवात झाली असून, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओरिसातील कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. विशेषत: केरळ, मुंबई, गोवा आणि कोकणातील तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद केरळमधील पुनालूर येथे ३९ अंश झाली आहे. तापमानवाढीच्या शहरांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील शहरांचा समावेश होत आहे.

विदर्भात गेल्या २४ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. दरम्यान, राज्यभरात हवामानात बदल नोंदविण्यात येत असतानाच, उत्तर मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा खालीच आहे. २४ तासांनंतर यात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.विदर्भाला पावसाचा इशारा१२ मार्च रोजी मुंबईतील आकाश अंशत: ढगाळ राहील. १३ मार्चला आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २० अंशांच्या आसपास राहील. १३ मार्चपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातweatherहवामानTemperatureतापमान