शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

महाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 16:26 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना बहुमतात राज्यात सत्तेवर येईल असं चित्र दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात लोकांमधील वातावरण वेगळे आहे.  उद्या आघाडीच्या बाजूने चांगला निकाल लागेल. २०१४ पेक्षा आघाडीच्या जागा जास्त जिंकून येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. 

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांसाठी निवडणूक एक ऊर्जा असते, निवडणुकीतल्या प्रचारातून वडिलांना बाहेर काढावं लागतं इतकं ते रमतात. महान योद्धा म्हणून निवडणुकीत शरद पवार लढले, साताऱ्यातील त्यांचे रुप पाहिलं तर एक आदर्श योद्धा काय असतो ते समजलं. मुलगी म्हणून अभिमान वाटला. निवडणुकीतला प्रत्येक उमेदवाराने कष्ट केलेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच लोकांमधलं जे वातावरण आहे, मूड होता. हे खूप वेगळं होतं. लोकांचा कल उद्याच कळेल. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचार केला. आमचे नेतेही विविध भागात प्रचार करत होते. शरद पवारांना मिळालेला प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. २०१४ ची राजकीय परिस्थिती वेगळी होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत वातावरण वेगळं आहे. सत्तेचा उन्माद भाजपाने केला. विरोधक दिलदार असायला हवा. सत्तेत राहून दानत असणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. सत्ता पचविता आली पाहिजे असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विविध चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढत आहे. उद्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान जागा टिकविणे आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणणे यासाठी भाजपाने प्रयत्न केले आहेत. तर युतीच्या माध्यमातून शिवसेनेनेही आमदारांची संख्या वाढविण्यासाठी कसरत केली आहे. त्यामुळे नेमक्या महायुतीला किती जागा मिळणार की महाआघाडी आपलं अस्तित्व टिकविणार हे २४ तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

 मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...

मोदी सरकारनं दिलं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; MSPमध्ये केली 'एवढी' वाढ

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन

उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी