शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

महाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 16:26 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना बहुमतात राज्यात सत्तेवर येईल असं चित्र दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात लोकांमधील वातावरण वेगळे आहे.  उद्या आघाडीच्या बाजूने चांगला निकाल लागेल. २०१४ पेक्षा आघाडीच्या जागा जास्त जिंकून येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. 

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांसाठी निवडणूक एक ऊर्जा असते, निवडणुकीतल्या प्रचारातून वडिलांना बाहेर काढावं लागतं इतकं ते रमतात. महान योद्धा म्हणून निवडणुकीत शरद पवार लढले, साताऱ्यातील त्यांचे रुप पाहिलं तर एक आदर्श योद्धा काय असतो ते समजलं. मुलगी म्हणून अभिमान वाटला. निवडणुकीतला प्रत्येक उमेदवाराने कष्ट केलेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच लोकांमधलं जे वातावरण आहे, मूड होता. हे खूप वेगळं होतं. लोकांचा कल उद्याच कळेल. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचार केला. आमचे नेतेही विविध भागात प्रचार करत होते. शरद पवारांना मिळालेला प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. २०१४ ची राजकीय परिस्थिती वेगळी होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत वातावरण वेगळं आहे. सत्तेचा उन्माद भाजपाने केला. विरोधक दिलदार असायला हवा. सत्तेत राहून दानत असणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. सत्ता पचविता आली पाहिजे असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विविध चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढत आहे. उद्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान जागा टिकविणे आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणणे यासाठी भाजपाने प्रयत्न केले आहेत. तर युतीच्या माध्यमातून शिवसेनेनेही आमदारांची संख्या वाढविण्यासाठी कसरत केली आहे. त्यामुळे नेमक्या महायुतीला किती जागा मिळणार की महाआघाडी आपलं अस्तित्व टिकविणार हे २४ तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

 मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...

मोदी सरकारनं दिलं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; MSPमध्ये केली 'एवढी' वाढ

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन

उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी