शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला!

By यदू जोशी | Updated: November 27, 2019 05:50 IST

‘एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही’, हा आपले पिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द केवळ ५६ आमदार निवडून आलेले असतानाही खरा करून दाखवले...

- यदु जोशी  ‘एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही’, हा आपले पिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द केवळ ५६ आमदार निवडून आलेले असतानाही खरा करून दाखवित असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठी बाजी जिंकत आणली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा ५६ आमदारांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळेल, असे कोणी म्हटले असते तर त्याचे हसेच झाले असते पण भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावत आता उद्धव मुख्यमंत्री होऊ घातले आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि चिरनिद्राही घेतली त्याच शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) उद्धव हे शपथ घेणार हे आता दृष्टिपथात आहे. हजारो शिवसैनिक त्या प्रसंगाचे साक्षिदार असतील.बाळासाहेबांसारखी आक्रमकता नाही, त्यांच्यासारखी वक्तृत्वशैलीदेखील नाही, बाळासाहेबांच्या तुलनेने अगदीच मवाळ वाटणारे उद्धव हे वडिलांचे राजकारणातील वारसदार म्हणून यशस्वी होणार नाहीत, बाळासाहेबांनंतर शिवसेना राहणारच नाही, उद्धव यांच्या तुलनेत त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे वारसदार शोभतात वगैरे टीका अनेकदा झाली. त्या सर्व टीकाकारांची तोंडे बंद करीत आज उद्धव हे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून देत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीचे आम्ही आधी भोई होतो आता या पालखीत आमचाच मुख्यमंत्री बसेल, हा निर्धार त्यांनी नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये सिद्ध केला आहे.

शिवसेना म्हटली की शिवराळ भाषा, शिवसेना म्हटली की काचा फोडणे, काळे फासणे, शिवसेना म्हटली की दंगल अशी या पक्षाची वर्षानुवर्षांची ओळख. शांत, संयमी, हसतमुख उद्धव यांनी ती बदलली. शिवसैनिकांच्या आक्रमकतेचे नेहमीच कौतुक व समर्थन करताना ती आक्रस्ताळी होता कामा नये, असा दंडक घालून दिला. ठाकरे घराण्यात कोणीही निवडणूक लढत नाही, ही परंपरा मोडीत काढत त्यांनी मुलगा आदित्य यांना आमदार केले आणि आज ते स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. ठाकरे घराण्यातील हे मोठे स्थित्यंतर उद्धव यांनी केले.शिवसेना म्हणजे ‘ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’असे बाळासाहेब म्हणत असत. त्याची कास धरत उद्धव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच हात घातला. मी मुंबईत राहतो मला शेतीचे काही कळत नाही पण शेतकऱ्यांचे दु:ख मला समजते’ असे सांगत त्यांनी गेल्या पाच वर्षांत सत्तेत असूनही अनेकदा सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. त्यातून त्यांनी शेतकºयांमध्ये स्वत:च्या नेतृत्वाबद्दल विश्वासाची पेरणी केली. भगवा टिळा लावून भगवा दुपट्टा गळ्यात टाकत ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत भारावलेला शिवसैनिक ही शिवसेनेची खरी ताकद आहे अन् मी त्याच्यासमोर नतमस्तक होतो असे सांगत त्यांनी शिवसैनिकांशी असलेली नाळ नेहमीच जपली.जेव्हा युद्ध आमनेसामने जिंकता येत नसते तेव्हा ते गनिमी काव्याने जिंकायचे असते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा वापर करीत ठाकरे यांनी भाजपवर मात केली आहे. मात्र हे करताना वर्षानुवर्षे ठाकरे घराण्याने ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला त्या काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत त्यांना घ्यावी लागली. बाळासाहेबांना दिलेल्या शब्दानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे हा उद्धव यांचा भावनिक विजय आहे पण तात्विक पराभव म्हणावा लागेल.सत्ताकारणासाठी भिन्न विचारांच्या पक्षांची साथ घेतली पण शिवसेनेचा लढाऊ स्वभाव बदलणार नाही हे पुढील काळात सिद्ध करण्याचे मोठे आव्हान उद्धव यांच्यासमोर असेल. ठोकशाहीवर विश्वास असणाºया शिवसेनेचे कर्णधार असलेल्या उद्धव यांना बहुपक्षांच्या साथीने लोकशाहीच्या चौकटीत आता कारभार करावा लागणार आहे. राजकारणात ‘जो जिता वही सिकंदर’ हेच खरे असते आणि उद्धव हे आज सिकंदर ठरले आहेत हे मात्र मान्यच करावे लागेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे