शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला!

By यदू जोशी | Updated: November 27, 2019 05:50 IST

‘एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही’, हा आपले पिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द केवळ ५६ आमदार निवडून आलेले असतानाही खरा करून दाखवले...

- यदु जोशी  ‘एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही’, हा आपले पिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द केवळ ५६ आमदार निवडून आलेले असतानाही खरा करून दाखवित असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठी बाजी जिंकत आणली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा ५६ आमदारांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळेल, असे कोणी म्हटले असते तर त्याचे हसेच झाले असते पण भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावत आता उद्धव मुख्यमंत्री होऊ घातले आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि चिरनिद्राही घेतली त्याच शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) उद्धव हे शपथ घेणार हे आता दृष्टिपथात आहे. हजारो शिवसैनिक त्या प्रसंगाचे साक्षिदार असतील.बाळासाहेबांसारखी आक्रमकता नाही, त्यांच्यासारखी वक्तृत्वशैलीदेखील नाही, बाळासाहेबांच्या तुलनेने अगदीच मवाळ वाटणारे उद्धव हे वडिलांचे राजकारणातील वारसदार म्हणून यशस्वी होणार नाहीत, बाळासाहेबांनंतर शिवसेना राहणारच नाही, उद्धव यांच्या तुलनेत त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे वारसदार शोभतात वगैरे टीका अनेकदा झाली. त्या सर्व टीकाकारांची तोंडे बंद करीत आज उद्धव हे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून देत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीचे आम्ही आधी भोई होतो आता या पालखीत आमचाच मुख्यमंत्री बसेल, हा निर्धार त्यांनी नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये सिद्ध केला आहे.

शिवसेना म्हटली की शिवराळ भाषा, शिवसेना म्हटली की काचा फोडणे, काळे फासणे, शिवसेना म्हटली की दंगल अशी या पक्षाची वर्षानुवर्षांची ओळख. शांत, संयमी, हसतमुख उद्धव यांनी ती बदलली. शिवसैनिकांच्या आक्रमकतेचे नेहमीच कौतुक व समर्थन करताना ती आक्रस्ताळी होता कामा नये, असा दंडक घालून दिला. ठाकरे घराण्यात कोणीही निवडणूक लढत नाही, ही परंपरा मोडीत काढत त्यांनी मुलगा आदित्य यांना आमदार केले आणि आज ते स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. ठाकरे घराण्यातील हे मोठे स्थित्यंतर उद्धव यांनी केले.शिवसेना म्हणजे ‘ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’असे बाळासाहेब म्हणत असत. त्याची कास धरत उद्धव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच हात घातला. मी मुंबईत राहतो मला शेतीचे काही कळत नाही पण शेतकऱ्यांचे दु:ख मला समजते’ असे सांगत त्यांनी गेल्या पाच वर्षांत सत्तेत असूनही अनेकदा सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. त्यातून त्यांनी शेतकºयांमध्ये स्वत:च्या नेतृत्वाबद्दल विश्वासाची पेरणी केली. भगवा टिळा लावून भगवा दुपट्टा गळ्यात टाकत ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत भारावलेला शिवसैनिक ही शिवसेनेची खरी ताकद आहे अन् मी त्याच्यासमोर नतमस्तक होतो असे सांगत त्यांनी शिवसैनिकांशी असलेली नाळ नेहमीच जपली.जेव्हा युद्ध आमनेसामने जिंकता येत नसते तेव्हा ते गनिमी काव्याने जिंकायचे असते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा वापर करीत ठाकरे यांनी भाजपवर मात केली आहे. मात्र हे करताना वर्षानुवर्षे ठाकरे घराण्याने ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला त्या काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत त्यांना घ्यावी लागली. बाळासाहेबांना दिलेल्या शब्दानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे हा उद्धव यांचा भावनिक विजय आहे पण तात्विक पराभव म्हणावा लागेल.सत्ताकारणासाठी भिन्न विचारांच्या पक्षांची साथ घेतली पण शिवसेनेचा लढाऊ स्वभाव बदलणार नाही हे पुढील काळात सिद्ध करण्याचे मोठे आव्हान उद्धव यांच्यासमोर असेल. ठोकशाहीवर विश्वास असणाºया शिवसेनेचे कर्णधार असलेल्या उद्धव यांना बहुपक्षांच्या साथीने लोकशाहीच्या चौकटीत आता कारभार करावा लागणार आहे. राजकारणात ‘जो जिता वही सिकंदर’ हेच खरे असते आणि उद्धव हे आज सिकंदर ठरले आहेत हे मात्र मान्यच करावे लागेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे