शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

Maharashtra Government: सत्तानाट्यात शरद पवारांचे डावपेच झाले यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:38 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली.

- नंदकिशोर पाटीलमुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. राजकीय डावपेचात अजुनही तेच बाजीगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता राष्टÑीय राजकारणातही पवारांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडे स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र, भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही, ही बाब स्पष्ट होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी केली.नेमकी हीच संधी साधत शरद पवारांनी आपले सर्व राजकीय कौशल्य आणि अनुभव पणाला लावत पटावरील सोंगट्या फिरवल्या आणि शिवसेनेच्या पाठिशी स्वत:च्या पक्षासह काँग्रेसलाही उभे केले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीची महाविकास आघाडी झाली असली तरी या आघाडीला काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा पाठिंबा मिळविणे ही अशक्यप्राय बाब होती. मात्र, शरद पवारांनी आधी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल या काँग्रेस नेत्यांचे मनपरिवर्तन केले आणि त्यांच्या माध्यमातून सोनिया गांधींचा पाठिंबा मिळविला.शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला राजी करण्याचे मोठे दिव्य कार्य पार पाडल्यानंतर महाआघाडीचे सत्तावाटप आणि किमान समान कार्यक्रम तयार करण्यातही पवारांची महत्वाची भूमिका बजावली.मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग येताच अजित पवारांनी बंड केले. रात्रीतून भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता. ज्या प्रमाणे १९७८ साली पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार रातोरात पाडले होते. त्याचीची पुनर्रावृत्ती अजित पवारांनी केली.शक्तिप्रदर्शन यशस्वी ठरले!राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या आमदारांना एकत्रित ठेवणे आवश्यक होते. अजितदादांच्या सोबत गेलेले आमदार परत पक्षात आणण्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्यासोबत १६२ आमदार आहेत, हे दाखविण्यासाठी सोमवारी आघाडीच्या सर्व आमदारांचे शक्तिप्रदर्शन पवारांनी घडवून आणले. हा ‘मास्टरस्ट्रोक’ होता. कारण तिथेच अजित पवार आणि भाजपचे अवसान गळाले.विश्वासार्हतेचा प्रश्नअजितदादांच्या बंडामागे शरद पवारांचाच हात असल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्टÑवादी काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षातही संभ्रम निर्माण झाला होता. आपली फसवणूक तर झाली नाही ना? अशी भावना काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये होती.मात्र, राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या पवारांनी राष्टÑवादीच्या गटनेतेपदी जयंत पाटील यांची निवड करून अजित पवारांना पहिला धक्का दिला. सर्वांना विश्वासात घेऊन अवघ्या ७९ तासात अजित पवारांचे बंड मोडून काढले.घटनातज्ज्ञांची मदतराज्यातील सत्तापेच कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर शरद पवारांनी देशभरातील घटनातज्ज्ञ, कायदे पंडित आणि अनुभवी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. गटनेत्याची निवड आणि व्हीपचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आधीच तजविज करून ठेवली होती. पक्षाचे सर्व आमदार आपल्यासोबत आणणे आणि कायदेशीर लढाईत बाजी मारून त्यांनी अजित पवारांना ‘योग्य’ तो संदेश दिला. शिवाय, भाजपचे आॅपरेशन लोट्सही हाणून पाडले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019