शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

Maharashtra Government: सत्तानाट्यात शरद पवारांचे डावपेच झाले यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:38 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली.

- नंदकिशोर पाटीलमुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. राजकीय डावपेचात अजुनही तेच बाजीगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता राष्टÑीय राजकारणातही पवारांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडे स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र, भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही, ही बाब स्पष्ट होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी केली.नेमकी हीच संधी साधत शरद पवारांनी आपले सर्व राजकीय कौशल्य आणि अनुभव पणाला लावत पटावरील सोंगट्या फिरवल्या आणि शिवसेनेच्या पाठिशी स्वत:च्या पक्षासह काँग्रेसलाही उभे केले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीची महाविकास आघाडी झाली असली तरी या आघाडीला काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा पाठिंबा मिळविणे ही अशक्यप्राय बाब होती. मात्र, शरद पवारांनी आधी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल या काँग्रेस नेत्यांचे मनपरिवर्तन केले आणि त्यांच्या माध्यमातून सोनिया गांधींचा पाठिंबा मिळविला.शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला राजी करण्याचे मोठे दिव्य कार्य पार पाडल्यानंतर महाआघाडीचे सत्तावाटप आणि किमान समान कार्यक्रम तयार करण्यातही पवारांची महत्वाची भूमिका बजावली.मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग येताच अजित पवारांनी बंड केले. रात्रीतून भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता. ज्या प्रमाणे १९७८ साली पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार रातोरात पाडले होते. त्याचीची पुनर्रावृत्ती अजित पवारांनी केली.शक्तिप्रदर्शन यशस्वी ठरले!राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या आमदारांना एकत्रित ठेवणे आवश्यक होते. अजितदादांच्या सोबत गेलेले आमदार परत पक्षात आणण्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्यासोबत १६२ आमदार आहेत, हे दाखविण्यासाठी सोमवारी आघाडीच्या सर्व आमदारांचे शक्तिप्रदर्शन पवारांनी घडवून आणले. हा ‘मास्टरस्ट्रोक’ होता. कारण तिथेच अजित पवार आणि भाजपचे अवसान गळाले.विश्वासार्हतेचा प्रश्नअजितदादांच्या बंडामागे शरद पवारांचाच हात असल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्टÑवादी काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षातही संभ्रम निर्माण झाला होता. आपली फसवणूक तर झाली नाही ना? अशी भावना काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये होती.मात्र, राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या पवारांनी राष्टÑवादीच्या गटनेतेपदी जयंत पाटील यांची निवड करून अजित पवारांना पहिला धक्का दिला. सर्वांना विश्वासात घेऊन अवघ्या ७९ तासात अजित पवारांचे बंड मोडून काढले.घटनातज्ज्ञांची मदतराज्यातील सत्तापेच कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर शरद पवारांनी देशभरातील घटनातज्ज्ञ, कायदे पंडित आणि अनुभवी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. गटनेत्याची निवड आणि व्हीपचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आधीच तजविज करून ठेवली होती. पक्षाचे सर्व आमदार आपल्यासोबत आणणे आणि कायदेशीर लढाईत बाजी मारून त्यांनी अजित पवारांना ‘योग्य’ तो संदेश दिला. शिवाय, भाजपचे आॅपरेशन लोट्सही हाणून पाडले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019