शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Maharashtra Government: सत्तानाट्यात शरद पवारांचे डावपेच झाले यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:38 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली.

- नंदकिशोर पाटीलमुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. राजकीय डावपेचात अजुनही तेच बाजीगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता राष्टÑीय राजकारणातही पवारांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडे स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र, भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही, ही बाब स्पष्ट होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी केली.नेमकी हीच संधी साधत शरद पवारांनी आपले सर्व राजकीय कौशल्य आणि अनुभव पणाला लावत पटावरील सोंगट्या फिरवल्या आणि शिवसेनेच्या पाठिशी स्वत:च्या पक्षासह काँग्रेसलाही उभे केले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीची महाविकास आघाडी झाली असली तरी या आघाडीला काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा पाठिंबा मिळविणे ही अशक्यप्राय बाब होती. मात्र, शरद पवारांनी आधी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल या काँग्रेस नेत्यांचे मनपरिवर्तन केले आणि त्यांच्या माध्यमातून सोनिया गांधींचा पाठिंबा मिळविला.शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला राजी करण्याचे मोठे दिव्य कार्य पार पाडल्यानंतर महाआघाडीचे सत्तावाटप आणि किमान समान कार्यक्रम तयार करण्यातही पवारांची महत्वाची भूमिका बजावली.मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग येताच अजित पवारांनी बंड केले. रात्रीतून भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता. ज्या प्रमाणे १९७८ साली पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार रातोरात पाडले होते. त्याचीची पुनर्रावृत्ती अजित पवारांनी केली.शक्तिप्रदर्शन यशस्वी ठरले!राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या आमदारांना एकत्रित ठेवणे आवश्यक होते. अजितदादांच्या सोबत गेलेले आमदार परत पक्षात आणण्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्यासोबत १६२ आमदार आहेत, हे दाखविण्यासाठी सोमवारी आघाडीच्या सर्व आमदारांचे शक्तिप्रदर्शन पवारांनी घडवून आणले. हा ‘मास्टरस्ट्रोक’ होता. कारण तिथेच अजित पवार आणि भाजपचे अवसान गळाले.विश्वासार्हतेचा प्रश्नअजितदादांच्या बंडामागे शरद पवारांचाच हात असल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्टÑवादी काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षातही संभ्रम निर्माण झाला होता. आपली फसवणूक तर झाली नाही ना? अशी भावना काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये होती.मात्र, राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या पवारांनी राष्टÑवादीच्या गटनेतेपदी जयंत पाटील यांची निवड करून अजित पवारांना पहिला धक्का दिला. सर्वांना विश्वासात घेऊन अवघ्या ७९ तासात अजित पवारांचे बंड मोडून काढले.घटनातज्ज्ञांची मदतराज्यातील सत्तापेच कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर शरद पवारांनी देशभरातील घटनातज्ज्ञ, कायदे पंडित आणि अनुभवी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. गटनेत्याची निवड आणि व्हीपचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आधीच तजविज करून ठेवली होती. पक्षाचे सर्व आमदार आपल्यासोबत आणणे आणि कायदेशीर लढाईत बाजी मारून त्यांनी अजित पवारांना ‘योग्य’ तो संदेश दिला. शिवाय, भाजपचे आॅपरेशन लोट्सही हाणून पाडले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019