शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:11 IST

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्यरात्रीनंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली आणि ती उठताच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सकाळी ७.४५ वाजता मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आकस्मिकपणे घडलेल्या या घडामोडीवर  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी लागला, त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासंदर्भात समर्थता दर्शविण्यासाठी मुदत दिली. भाजपने असमर्थता व्यक्त करताच, शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. शिवाय शिवसेनेला पाठिंब्यासंदर्भात आमदारांच्या सह्यांचे स्वतंत्र पत्रे सादर करण्यास सांगितले होते. हा नियम फडणवीस व अजित पवार यांना का लावण्यात आला नाही, असा सवाल शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजच्या घडामोडींनंतर उपस्थित केला आहे.शहानिशा केली का-नवाब मलिकअजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून आमदारांचे जे पत्र सादर केले, त्यातील नावांची वा खरोखर त्या आमदारांचा पाठिंबा आहे का, याची शहानिशा केली का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला.फडणवीस व अजित पवार यांनी राज्यपालांना किती आमदारांच्या आणि किती वाजता पाठिंब्याचे पत्र दिले?याचे उत्तर राज्यपालांनी द्यायला हवे, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस