शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:11 IST

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्यरात्रीनंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली आणि ती उठताच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सकाळी ७.४५ वाजता मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आकस्मिकपणे घडलेल्या या घडामोडीवर  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी लागला, त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासंदर्भात समर्थता दर्शविण्यासाठी मुदत दिली. भाजपने असमर्थता व्यक्त करताच, शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. शिवाय शिवसेनेला पाठिंब्यासंदर्भात आमदारांच्या सह्यांचे स्वतंत्र पत्रे सादर करण्यास सांगितले होते. हा नियम फडणवीस व अजित पवार यांना का लावण्यात आला नाही, असा सवाल शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजच्या घडामोडींनंतर उपस्थित केला आहे.शहानिशा केली का-नवाब मलिकअजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून आमदारांचे जे पत्र सादर केले, त्यातील नावांची वा खरोखर त्या आमदारांचा पाठिंबा आहे का, याची शहानिशा केली का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला.फडणवीस व अजित पवार यांनी राज्यपालांना किती आमदारांच्या आणि किती वाजता पाठिंब्याचे पत्र दिले?याचे उत्तर राज्यपालांनी द्यायला हवे, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस