शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 09:34 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिन्याभराचा अवधी लोटला तरी महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिन्याभराचा अवधी लोटला तरी महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. स्पष्ट बहुमतानंतर मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेला दुरावा, तसेच एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्यास चालढकल सुरू केल्याने राज्यात सत्तापेच निर्माण झाला आहे. दरम्यान, एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तावाटपाबाबत चर्चा करत आहे. तर दुसरीकडे भाजपाने ५०-५० टक्के सत्तावाटपाचा फॉर्म्युला मान्य केल्यास शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करण्याचा विचार करू शकते, अशी माहिती शिवसेनेमधील सूत्रांनी दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार भाजपाने ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर सहमती दर्शवली आणि सत्तास्थानांचे समसमान वाटप करण्याची तयारी दाखवली, तर शिवसेनेला भाजपासोबतच्या युतीचे बंध पुन्हा बांधण्यास आनंदच होईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी म्हटले आहे. भाजपा आणि शिवसेना या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षामध्ये महाराष्ट्रात सुमारे ३० वर्षांपासून युती होती. मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची केलेली आग्रही मागणी आणि त्याला भाजपाने दिलेल्या ठाम नकारानंतर दोन्ही पक्षांतील युती मोडली होती.

दरम्यान, सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबच सत्तास्थापनेसाठीची चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शरद पवार आणि आमच्या आघाडीची काळजी तुम्ही अजिबात करू नका. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात लवकरच सरकार स्थापन करणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपाचा प्लान बी; राष्ट्रवादीसोबत आघाडीची तयारी

भाजपानं सत्ता स्थापनेसाठी प्लान बीदेखील तयार ठेवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची भूमिका असेल. भाजपाचे 105 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यांचं संख्याबळ 159 होतं. याशिवाय भाजपाला लहान पक्ष व अपक्ष अशा 14 आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ 173 होतं. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे 54 सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात 234 सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला 117 आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे 119 आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीनं राष्ट्रवादीनं 2014 मध्ये भाजपाला मदत दिली होती. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली होती.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला साथ दिल्यास शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची तयारी भाजपाने केली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत राज्यातील राजकारण कोणते वळण घेते हे पाहावे लागेल. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण