शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 09:34 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिन्याभराचा अवधी लोटला तरी महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिन्याभराचा अवधी लोटला तरी महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. स्पष्ट बहुमतानंतर मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेला दुरावा, तसेच एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्यास चालढकल सुरू केल्याने राज्यात सत्तापेच निर्माण झाला आहे. दरम्यान, एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तावाटपाबाबत चर्चा करत आहे. तर दुसरीकडे भाजपाने ५०-५० टक्के सत्तावाटपाचा फॉर्म्युला मान्य केल्यास शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करण्याचा विचार करू शकते, अशी माहिती शिवसेनेमधील सूत्रांनी दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार भाजपाने ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर सहमती दर्शवली आणि सत्तास्थानांचे समसमान वाटप करण्याची तयारी दाखवली, तर शिवसेनेला भाजपासोबतच्या युतीचे बंध पुन्हा बांधण्यास आनंदच होईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी म्हटले आहे. भाजपा आणि शिवसेना या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षामध्ये महाराष्ट्रात सुमारे ३० वर्षांपासून युती होती. मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची केलेली आग्रही मागणी आणि त्याला भाजपाने दिलेल्या ठाम नकारानंतर दोन्ही पक्षांतील युती मोडली होती.

दरम्यान, सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबच सत्तास्थापनेसाठीची चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शरद पवार आणि आमच्या आघाडीची काळजी तुम्ही अजिबात करू नका. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात लवकरच सरकार स्थापन करणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपाचा प्लान बी; राष्ट्रवादीसोबत आघाडीची तयारी

भाजपानं सत्ता स्थापनेसाठी प्लान बीदेखील तयार ठेवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची भूमिका असेल. भाजपाचे 105 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यांचं संख्याबळ 159 होतं. याशिवाय भाजपाला लहान पक्ष व अपक्ष अशा 14 आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ 173 होतं. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे 54 सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात 234 सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला 117 आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे 119 आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीनं राष्ट्रवादीनं 2014 मध्ये भाजपाला मदत दिली होती. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली होती.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला साथ दिल्यास शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची तयारी भाजपाने केली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत राज्यातील राजकारण कोणते वळण घेते हे पाहावे लागेल. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण