शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Government : भाजपाला जमेना, महाविकासआघाडीचे काही ठरेना, अखेर राज्यपालांनीचे केले सत्ताधिकारांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 3:45 PM

Maharashtra News: राज्यात नव्या सरकारचा अद्याप शपथविधी होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यपालांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई - मुख्यमंत्रिपदाच्या वादातून तुटलेली युती आणि शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेली आघाडी यामुळे राज्यात निर्धारित कालावधीत सरकार स्थापन होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सरकार स्थापनेसाठी आवश्यक आकडा जुळवणे शक्य झालेले नाही, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातही सरकार स्थापनेबाबत अद्यापही चर्चाच सुरू आहेत. त्यामुळे नव्या सरकारचा अद्याप शपथविधी होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत प्रशासकीय गाडा चालवण्यासाठी राज्यपालांनी मोठा निर्णय घेतला असून, त्यांनी आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांमध्ये सत्ताधिकारांचे वाटप केले आहे.

 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यकारभार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात आला आहे. दरम्यान, त्यांच्या मदतीसाठी केंद्रातून तीन अधिकारी पाठवण्यात आले आहेत. आता राज्यपालांनी राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये सत्ताधिकारा्ंचे वाटप केले आहे. या आता नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत या अधिकारवाटपानुसार राज्य कारभार चालणार आहे. या संदर्भातील एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 प्रशासनामध्ये ज्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते अशा बाबी मुख्य सचिव थेट राज्यपालांना सांगतील. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्तावही मुख्य सचिवच राज्यपालांकडे सादर करतील. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही राज्यपाल मुख्य सचिवांच्या माध्यमातून निर्णय घेतील. विविध मंत्र्यांशी संबधित कामांबाबत मुख्य सचिव राज्यपालांच्या परवानगीने निर्णय घेतली. एकापेक्षा अधिक मंत्रालयांचा आणि विभागांचा संबंध असणाऱ्या प्रकरणात राज्यपाल मुख्य सचिवांच्या सल्ल्याने निर्णय घेतील.

विधिमंडळाशी संबंधित बाबींची माहिती प्रत्येक विभागाच्या सचिवांच्या मान्यतेने विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवली जाईल. मुख्य सचिवांच्या अधिकारकक्षेबाहेरील पण प्रशासकीय  आणि वित्तीयदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींबाबतचे निर्णय मुख्य सचिव हे  राज्यपालांकडेच सादर करतील. महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींचे निर्णय घ्यायचे झाल्यास मुख्य सचिव असे विषय राज्यपालांना सादर करतील.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019