शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
4
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
5
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
6
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
7
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
8
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
9
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
10
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
11
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
12
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
13
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
14
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
15
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
16
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
17
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
18
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
19
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
20
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला हवेत ६० हजार कोटी; घोषणेची प्रतीक्षा

By यदू जोशी | Updated: November 28, 2019 05:32 IST

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायची तर शासनाच्या तिजोरीवर ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे.

 - यदु जोशीमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायची तर शासनाच्या तिजोरीवर ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची आग्रही भूमिका सातत्याने घेतली आहे. आता मुख्यमंत्री म्हणून ही कर्जमाफी ते कधी जाहीर करतात या बाबत उत्सुकता आहे.देवेंद्र फडणवीस सरकारने ४४ लाख ५० हजार शेतकºयांना १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दिली होती. मात्र, ती सरसकट दिलेली नव्हती. १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते आणि त्यावरील रकमेचे कर्ज असल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने भरली आणि उर्वरित रक्कम ही शेतकºयांना भरावी लागली होती. या शिवाय सावकारांकडील शेतकºयांचे कर्ज शासनाने स्वत:च्या तिजोरीतून भरत दिलासा दिला होता. ७१ लाख शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. केवळ शेतीवर अवलंबून नसलेल्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नव्हती.सहकार विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, फडणवीस सरकारने जून २०१६ पर्यंत थकित असलेले कर्ज माफ करण्याचा निकष लावला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आता सातबाराच कोरा करायचा असेल तर त्यानंतर असलेली कर्जाची थकबाकीदेखील माफ करावी लागेल. ही रक्कम ६० हजार कोटींच्या घरात असेल.आधीच्या सरकारने दीड लाखांपर्यंतचेच कर्ज माफ केले होते आता नव्या सरकारने त्याहून अधिक रकमेची कर्जेही सरसकट माफ केली तर त्याचा दहाएक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा शासनाच्या तिजोरीवर पडेल. जून २०१६ मध्ये घेतलेल्या आणि परतफेड न केलेल्या थकबाकीची रक्कम ४० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.राज्य शासन जून २०१६ नंतरचेही कर्ज कधी ना कधी कर्ज माफ करेल असे मानून असंख्य शेतकºयांचा कल हा परतफेड न करण्यामागे आहे. त्यातच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेतकºयांना मोठी कर्जमाफी देणार अशा बातम्या अलिकडे येत असताना परतफेडीबाबतची अनुत्सुकता वाढली आहे.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रम ठरविताना सरसकट कर्जमाफीचा विषय अजेंड्यावर घेतलेला आहे की नाही या बाबत अद्याप स्पष्टता नाही.विशेषत: शिवसेना त्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही राहिली आहे आणि भाजपबरोबर सत्तेत असतानाही त्यांनी ही मागणी लावून धरली होती. माहिती अशी आहे की किमान समान कार्यक्रम निश्चित करताना महाराष्ट्र विकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांनी या संदर्भात वित्त विभागाच्या काही अधिकाºयांना अलिकडे बोलावून घेत चर्चा केली होती, तेव्हा तिजोरीची अवस्था त्यांनी सांगितली होती.राज्यावर४.७१ लाख कोटी रुपयांचे कर्जराज्य शासनावर ४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ साधताना सरकारला नेहमीच कसरत करावी लागते. वेतन, निवृत्तीवेतन आणि व्याज यावरील खर्च १ लाख ८६ हजार ८०० कोटी रुपये असतो.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019