शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दहा वर्षांचा पाऊस ‘तपासून’ वाजला ९२ परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 5:37 AM

९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींची निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे.

मुंबई : ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींची निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. ओबीसी आरक्षणाशिवायच ही निवडणूक होणार आहे. मात्र, १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय या आरक्षणाबाबत काय निर्णय देते, त्यावर या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळणार की नाही, हे निश्चित होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ओबीसींचा इम्पिरिकल डाटा समर्पित आयोगाने शुक्रवारी राज्य सरकारला सादर केला. आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया यांनी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे हा डाटा सोपविला. आता १२ जुलैच्या सुनावणीपूर्वी सरकार हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करेल आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण बहाल करण्याची विनंती करेल. 

१७ जिल्ह्यांतील पालिकांची निवडणूकपुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलडाणा.

निवडणुकीचा कार्यक्रमउमेदवारी अर्ज भरणे : २२ ते २८ जुलै (२३, २४ जुलै वगळून)अर्जांची छाननी : २९ जुलैअर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ ऑगस्ट मतदान : १८ ऑगस्ट मतमोजणी, निकाल : १९ ऑगस्ट

धनुष्यबाणाचे काय होणार? या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला, याबाबत उत्सुकता असेल. दोन्ही गट धनुष्यबाणावर दावा करण्याची शक्यता आहे. 

कसोटी शिंदे-भाजप अन् मविआचीहीएकनाथ शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सत्तेतील नव्या युतीची मोठी कसोटी लागणार आहे. महाविकास आघाडी सत्तेतून गेल्यानंतरही अभेद्य राहणार का, हेही स्पष्ट होईल. 

पावसाच्या आकडेवारीवर निर्णयराज्यात २०० हून अधिक नगर परिषदांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. पण, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात जास्त पाऊस नसेल अशाच नगर परिषदांच्या निवडणुका आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यासाठी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि दहा वर्षांतील पावसाच्या सरासरीचा अभ्यास करूनच आयोगाने हा निर्णय घेतला.

नव्या सरकारसमोर आरक्षणाचे आव्हानओबीसी आरक्षणाचा सातत्याने आग्रह धरणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ओबीसी आरक्षण हे १८ ऑगस्टला होणाऱ्या ९२ नगर परिषदा व चार नगर पंचायतींच्या निवडणुकीत बहाल करण्याचे आव्हान असेल. 

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची कोणतीही निवडणूक घेऊ नये. राज्य सरकारने त्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र