शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:20 IST

Manoj Jarange Patil - Uday Samant : या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.अंतरवाली सराटीत उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, उदय सामंत यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाटी सर्व  पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आणि उमेदवार जाहीर करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. तसेच, उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. यानंतर उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, "मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो होतो. यादरम्यान, मी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं, त्यांना वेळ आहे का, ते दिवसभर कामात व्यस्त असतात. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झाले आहेत, त्यामुळे एक मित्र म्हणून मी त्यांना भेटावं बोलावं या उद्देशाने आलो होतो. रात्री भेटलं तरी बातमी होते, उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते. त्यामुळं करायचं काय हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे. आजची चर्चा राजकीय चर्चा नव्हती, मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली,  चहा घेतला आणि निघालो, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही."

याचबरोबर, मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या वक्तव्यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं किंवा उभं करणं हा एक त्यातला प्रकार आहे.मनोज जरांगे यांना जो प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी जे आंदोलन केलं, त्याच्यावर जर ते उमेदवार उभे करणार असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या सोबत असणाऱ्यांचा तो अधिकार आहे. त्यामध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही. या दरम्यान एक मित्र म्हणून देखील चर्चा होऊ शकते, भेट होऊ शकते. या भेटीकडे आणि चर्चेकडे दोन मित्रांनी केलेली चर्चा म्हणूनच बघावं अशी माझी विनंती आहे." दुसरीकडे, उदय सामंत यांच्या भेटीबाबत मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलUday Samantउदय सामंतPoliticsराजकारणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४