शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:20 IST

Manoj Jarange Patil - Uday Samant : या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.अंतरवाली सराटीत उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, उदय सामंत यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाटी सर्व  पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आणि उमेदवार जाहीर करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. तसेच, उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. यानंतर उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, "मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो होतो. यादरम्यान, मी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं, त्यांना वेळ आहे का, ते दिवसभर कामात व्यस्त असतात. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झाले आहेत, त्यामुळे एक मित्र म्हणून मी त्यांना भेटावं बोलावं या उद्देशाने आलो होतो. रात्री भेटलं तरी बातमी होते, उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते. त्यामुळं करायचं काय हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे. आजची चर्चा राजकीय चर्चा नव्हती, मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली,  चहा घेतला आणि निघालो, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही."

याचबरोबर, मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या वक्तव्यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं किंवा उभं करणं हा एक त्यातला प्रकार आहे.मनोज जरांगे यांना जो प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी जे आंदोलन केलं, त्याच्यावर जर ते उमेदवार उभे करणार असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या सोबत असणाऱ्यांचा तो अधिकार आहे. त्यामध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही. या दरम्यान एक मित्र म्हणून देखील चर्चा होऊ शकते, भेट होऊ शकते. या भेटीकडे आणि चर्चेकडे दोन मित्रांनी केलेली चर्चा म्हणूनच बघावं अशी माझी विनंती आहे." दुसरीकडे, उदय सामंत यांच्या भेटीबाबत मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलUday Samantउदय सामंतPoliticsराजकारणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४