शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:30 IST

Jayant Patil News: विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटलांनी बंडखोर उमेदवारांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले. 

Maharashtra Election Jayant Patil News : 'कुठल्याही परिस्थिती अधिकृत उमेदवारांसाठी ताकद लावली पाहिजे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोरांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

औदुंबर येथे महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटलांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं. तर महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. 

जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

"आम्ही लहानपणापासून इतिहास काय वाचला की, महाराष्ट्राची स्वारी छत्रपती शिवाजी महाराज हे गुजरातला गेले आणि तिथली संपत्ती आणून महाराष्ट्रातील किल्ले उभे करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. पण, देवेंद्र फडणवीस अमित शाहांना बरं वाटावं म्हणून सांगतात की, लुटायला नव्हते आले, आपली भेट घ्यायला आले होते. गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची? त्यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे बदलायला लागले", असा टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.  

गटबाजीवर भाष्य, जयंत पाटील काय बोलले?

"आपण एकत्रितपणानं, एकसंघपणानं आपले छोटे-छोटे वाद, एकमेकांच्या विरोधात लढणं, छोटं राजकारण थोडंस बाजूला ठेवा. लढायला भरपूर आयुष्य आहे सगळ्यांना. आता मात्र काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा (शरद पवार) उमेदवार, शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार या महाराष्ट्रात उभा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू", असे म्हणत जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतील गटबाजीवर भाष्य केलं.

सत्ता गेली, तर कुत्रही विचारणार नाही -जयंत पाटील 

ते म्हणाले, "थोडंस मोठं मन ठेवा. काही भांड्याला भांड लागलं असेल, तर थोडंस बाजूला ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांसाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली... एक-एक आमदार महत्त्वाचा आहे सांगतोय. एकदा का सत्ता गेली ना, कुत्र पण विचारणार नाही. एक सांगतो लय गंमती करू नका. कदम साहेब असं म्हणायचे. एकदा घोटाळा झाला ना, भरून येणार नाही. आणि जेवढे आम्ही आज आवाज काढून बोलतोय, असली माणसं परत आवाज काढणार नाही. निवांत घरात जाऊन बसतील. रिटायर होतील", असे जयंत पाटील म्हणाले.

 

मुख्यमंत्रिपदाबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?

"छोट्या-छोट्या गोष्टी मन अडकवू नका. आपण सगळ्यांनी ताकद लावली, तरच सरकार येणार आहे. सरकार आल्यानंतर तुम्हाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्री करा. काही घाई नाही कुणाची", अशा शब्दात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024palus-kadegaon-acपलूस कडेगावJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी