शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:30 IST

Jayant Patil News: विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटलांनी बंडखोर उमेदवारांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले. 

Maharashtra Election Jayant Patil News : 'कुठल्याही परिस्थिती अधिकृत उमेदवारांसाठी ताकद लावली पाहिजे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोरांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

औदुंबर येथे महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटलांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं. तर महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. 

जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

"आम्ही लहानपणापासून इतिहास काय वाचला की, महाराष्ट्राची स्वारी छत्रपती शिवाजी महाराज हे गुजरातला गेले आणि तिथली संपत्ती आणून महाराष्ट्रातील किल्ले उभे करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. पण, देवेंद्र फडणवीस अमित शाहांना बरं वाटावं म्हणून सांगतात की, लुटायला नव्हते आले, आपली भेट घ्यायला आले होते. गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची? त्यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे बदलायला लागले", असा टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.  

गटबाजीवर भाष्य, जयंत पाटील काय बोलले?

"आपण एकत्रितपणानं, एकसंघपणानं आपले छोटे-छोटे वाद, एकमेकांच्या विरोधात लढणं, छोटं राजकारण थोडंस बाजूला ठेवा. लढायला भरपूर आयुष्य आहे सगळ्यांना. आता मात्र काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा (शरद पवार) उमेदवार, शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार या महाराष्ट्रात उभा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू", असे म्हणत जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतील गटबाजीवर भाष्य केलं.

सत्ता गेली, तर कुत्रही विचारणार नाही -जयंत पाटील 

ते म्हणाले, "थोडंस मोठं मन ठेवा. काही भांड्याला भांड लागलं असेल, तर थोडंस बाजूला ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांसाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली... एक-एक आमदार महत्त्वाचा आहे सांगतोय. एकदा का सत्ता गेली ना, कुत्र पण विचारणार नाही. एक सांगतो लय गंमती करू नका. कदम साहेब असं म्हणायचे. एकदा घोटाळा झाला ना, भरून येणार नाही. आणि जेवढे आम्ही आज आवाज काढून बोलतोय, असली माणसं परत आवाज काढणार नाही. निवांत घरात जाऊन बसतील. रिटायर होतील", असे जयंत पाटील म्हणाले.

 

मुख्यमंत्रिपदाबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?

"छोट्या-छोट्या गोष्टी मन अडकवू नका. आपण सगळ्यांनी ताकद लावली, तरच सरकार येणार आहे. सरकार आल्यानंतर तुम्हाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्री करा. काही घाई नाही कुणाची", अशा शब्दात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024palus-kadegaon-acपलूस कडेगावJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी