शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:30 IST

Jayant Patil News: विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटलांनी बंडखोर उमेदवारांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले. 

Maharashtra Election Jayant Patil News : 'कुठल्याही परिस्थिती अधिकृत उमेदवारांसाठी ताकद लावली पाहिजे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोरांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

औदुंबर येथे महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटलांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं. तर महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. 

जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

"आम्ही लहानपणापासून इतिहास काय वाचला की, महाराष्ट्राची स्वारी छत्रपती शिवाजी महाराज हे गुजरातला गेले आणि तिथली संपत्ती आणून महाराष्ट्रातील किल्ले उभे करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. पण, देवेंद्र फडणवीस अमित शाहांना बरं वाटावं म्हणून सांगतात की, लुटायला नव्हते आले, आपली भेट घ्यायला आले होते. गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची? त्यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे बदलायला लागले", असा टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.  

गटबाजीवर भाष्य, जयंत पाटील काय बोलले?

"आपण एकत्रितपणानं, एकसंघपणानं आपले छोटे-छोटे वाद, एकमेकांच्या विरोधात लढणं, छोटं राजकारण थोडंस बाजूला ठेवा. लढायला भरपूर आयुष्य आहे सगळ्यांना. आता मात्र काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा (शरद पवार) उमेदवार, शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार या महाराष्ट्रात उभा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू", असे म्हणत जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतील गटबाजीवर भाष्य केलं.

सत्ता गेली, तर कुत्रही विचारणार नाही -जयंत पाटील 

ते म्हणाले, "थोडंस मोठं मन ठेवा. काही भांड्याला भांड लागलं असेल, तर थोडंस बाजूला ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांसाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली... एक-एक आमदार महत्त्वाचा आहे सांगतोय. एकदा का सत्ता गेली ना, कुत्र पण विचारणार नाही. एक सांगतो लय गंमती करू नका. कदम साहेब असं म्हणायचे. एकदा घोटाळा झाला ना, भरून येणार नाही. आणि जेवढे आम्ही आज आवाज काढून बोलतोय, असली माणसं परत आवाज काढणार नाही. निवांत घरात जाऊन बसतील. रिटायर होतील", असे जयंत पाटील म्हणाले.

 

मुख्यमंत्रिपदाबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?

"छोट्या-छोट्या गोष्टी मन अडकवू नका. आपण सगळ्यांनी ताकद लावली, तरच सरकार येणार आहे. सरकार आल्यानंतर तुम्हाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्री करा. काही घाई नाही कुणाची", अशा शब्दात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024palus-kadegaon-acपलूस कडेगावJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी