शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:49 PM

मोदींमुळे केवळ मोजक्या उद्योगपतींचा विकास झाल्याची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार फक्त 15-20 उद्योगपतींची चौकीदारी करत आहे. सर्वसामान्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून जनतेच्या खिशातील पैसा विजय माल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या घरात गेला. देशातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. मात्र मोदी, देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्थेवर बोलण्यास अजिबात तयार नाहीत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लगावला. धारावी येथील 90 फूट रस्त्यावर आयोजित पक्षाच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल म्हणाले,  नोटबंदीमध्ये सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागले. मात्र अदानी,  अंबानी रांगेत उभे होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लघु, मध्यम उद्योग बंद पडत आहेत. धारावीतील युनिट बंद पडत आहेत. मात्र सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही. गब्बर सिंह टॅक्समुळे (जीएसटी) फायदा झालेला एकतरी व्यापारी तुमच्या नजरेत आहे का ? सरकारने अनेक कायदे बदलले. मात्र जीएसटी कायदा बदलण्यास ते तयार नाहीत. अर्थव्यवस्थेची अवस्था अशीच राहिली, तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बेरोजगार तरुण, शेतकरी, त्रासलेली जनता सरकारकडे न्याय मागत आहे त्यांना न्याय मिळाला नाही तर हा वर्ग सरकारकडून झगडून न्याय मिळवेल. देशाचे भविष्य बदलण्याची ताकद मूठभर उद्योगपतींमध्ये नाही, तर सर्वसामान्य तरुण,  शेतकरी, लघु व मध्यम उद्योजक यांच्यामध्ये आहे. त्यांच्या हातात घातलेली अडचणीची बेडी काढल्यास चमत्कार होईल. मात्र हे करण्याची विद्यमान सरकारची क्षमता नाही. हे काम काँग्रेसच करु शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही. सरकारने कर्जमाफी केल्याचा दावा केला होता. मात्र तुमच्यापैकी कुणाचे कर्ज माफ झाले आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कुणाचेही नाही असे उत्तर उपस्थितांमधून आले. पैसा गोरगरीबांचा व त्यातून अदानी,  अंबानी मौजमजा मारतात असा आरोप त्यांनी केला. मोठ्या उद्योगपतींना लाखो कोटी रुपये देण्याऐवजी लहान उद्योजकांना निधी उपलब्ध करुन दिल्यास अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊ शकेल असे ते म्हणाले. देशातील सर्वसामान्य पुढे जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने देश पुढे जाईल. छोटे दुकानदार, लघु ,मध्यम उद्योजकांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले हा प्रश्न मोदी नेहमी  विचारतात. पाच वर्षांत जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान मोदींच्या सरकारने केले. ते कॉंग्रेसने केले नाही असा पलटवार त्यांनी केला. मेक इन इंडियाची घोषणा करणाऱ्यांनी मेक इन धारावीकडे दुर्लक्ष केले. धारावी गरिबांची शक्ती आहे. प्रत्येक शहरात धारावी आहे. तुम्ही धारावीला समजू शकला नाहीत, तर देशाला समजू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था