शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 10:51 IST

महाराष्ट्र निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असलं, तरी भाजपा आणि शिवसेनेतील रस्सीखेचामुळे राज्यात अद्याप सरकार स्थापन होताना दिसत नाहीए.

विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असलं, तरी भाजपा आणि शिवसेनेतील रस्सीखेचामुळे राज्यात अद्याप सरकार स्थापन होताना दिसत नाहीए. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे आणि भाजपा हे पद सोडायला अजिबात तयार नाही. किंबहुना, आमचं ठरलंय आणि ठरलंय तसंच होईल, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्रिपदाच्या समान वाटणीचं ठरलंच नव्हतं, असं जाहीर केलंय. या विधानावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झालेत आणि युतीतील चर्चेलाच खीळ बसल्याचं चित्र निर्माण झालंय. 

अर्थात, चर्चेचं घोडं अडलं असलं तरी दबावाचं राजकारण दोन्ही बाजूंनी सुरू आहे. सरकार स्थापनेसाठी सगळे पर्याय खुले असल्याचं सांगत दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्रिपद आणि १६ मंत्रिपदं शिवसेनेला सोडण्याचा प्रस्ताव भाजपाने दिल्याचं कळतं. पण कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं सेनेनं म्हटलंय. मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आल्याचं कुणीही समजू नये, असा टोला उद्धव यांनी फडणवीसांना लगावला आहे. दुसरीकडे, या दोघांच्या भांडणाचा लाभ करून घेण्याची संधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते साधताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर, राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यतांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • शक्यता क्रमांक १

भाजपा-शिवसेनेचं मनोमीलन होईल. शिवसेना उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारेल अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. 

  • शक्यता क्रमांक २

शिवसेनेनं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिल्यास, विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेचा दावा करावा लागेल आणि १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागेल. परंतु, सर्व अपक्षांनी पाठिंबा दिला तरीही १४५ चा आकडा त्यांना गाठता येऊ शकत नाही. अशावेळी, ते राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मागू शकतात. बहुमत चाचणीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपा कार्यभाग साधेल. परंतु, अशा परिस्थितीत स्थिर सरकार देणं अत्यंत कठीण असेल.

  • शक्यता क्रमांक ३

शिवसेनेतील आमदारांचा गट फोडून भाजपा बहुमत सिद्ध करू शकते. 

  • शक्यता क्रमांक ४

देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होतील किंवा बाहेरून पाठिंबा देतील. 

  • शक्यता क्रमांक ५

राष्ट्रवादी काँग्रेस आपले ५४ आमदार आणि काँग्रसचे 44 आमदार या जोरावर सरकार स्थापन करेल आणि शिवसेना त्यांना बाहेरून पाठिंबा देईल. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं जाईल. 

  • शक्यता क्रमांक ६

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यापैकी कुणीही सरकार स्थापन करू शकलं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल आणि सर्वाधिकार राज्यपालांना मिळतील. भाजपासाठी ती मोठी नामुष्की असेल. पण हा पर्याय त्यांच्या पथ्यावर पडणाराही आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा''

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?

ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम

पाच वर्षे सत्ता सांभाळूनही मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर मग कधी मिळणार?

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी? 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस