शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 08:43 IST

शब्द वाजपेयींचे, टीका भाजपावर; संजय राऊत यांचा पुन्हा हल्लाबोल

मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊतभाजपावर दररोज हल्लाबोल करत आहेत. काल कवी दुष्यंत कुमार यांच्या शब्दातून भाजपावर निशाणा साधल्यानंतर आज राऊत यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी याबद्दलचे संकेत दिले होते.'आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें : ‘‘न दैन्यं न पलायनम्।’’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. अटलबिहारी वाजपेयींनी हे वाक्य म्हटलं होतं, त्याची आठवण राऊत यांनी भाजपाला करुन दिली आहे. न दैन्यं न पलायनम् हा गीतेमधला संदेश असल्याचं राऊत यांनी ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे. कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है, असा या संदेशाचा अर्थ होतो. राऊत गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष टीका करत आहेत.  तत्पूर्वी काल संजय राऊत यांनी दुष्यंत कुमारांच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता. तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं, या कवितेतून राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. याबद्दल त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दुष्यंत कुमार, बशीर बद्र हे कवी मला आवडतात. अटलजींनी केलेलं लिखाणदेखील मला आवडतं. आता पुढे माझ्या ट्विटमध्ये अटलजीदेखील येतील, असं राऊत म्हणाले होते. यानंतर आज त्यांनी अटलजींचे शब्द ट्विट केले. त्यातून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपावर हल्ला चढवला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा