शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 08:43 IST

शब्द वाजपेयींचे, टीका भाजपावर; संजय राऊत यांचा पुन्हा हल्लाबोल

मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊतभाजपावर दररोज हल्लाबोल करत आहेत. काल कवी दुष्यंत कुमार यांच्या शब्दातून भाजपावर निशाणा साधल्यानंतर आज राऊत यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी याबद्दलचे संकेत दिले होते.'आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें : ‘‘न दैन्यं न पलायनम्।’’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. अटलबिहारी वाजपेयींनी हे वाक्य म्हटलं होतं, त्याची आठवण राऊत यांनी भाजपाला करुन दिली आहे. न दैन्यं न पलायनम् हा गीतेमधला संदेश असल्याचं राऊत यांनी ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे. कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है, असा या संदेशाचा अर्थ होतो. राऊत गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष टीका करत आहेत.  तत्पूर्वी काल संजय राऊत यांनी दुष्यंत कुमारांच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता. तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं, या कवितेतून राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. याबद्दल त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दुष्यंत कुमार, बशीर बद्र हे कवी मला आवडतात. अटलजींनी केलेलं लिखाणदेखील मला आवडतं. आता पुढे माझ्या ट्विटमध्ये अटलजीदेखील येतील, असं राऊत म्हणाले होते. यानंतर आज त्यांनी अटलजींचे शब्द ट्विट केले. त्यातून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपावर हल्ला चढवला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा