शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Maharashtra Election 2019: महायुतीमधील जागावाटपावर उद्धव ठाकरेंचं सूचक भाष्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 15:41 IST

भाजपानं मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीवर उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रिया

मुंबई: महायुतीमधील जागावाटपाचं गुऱ्हाळ बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. शिवसेनेनं निम्म्या जागांचा आग्रह धरला होता. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून शिवसेनेला तसा शब्ददेखील देण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपानं शब्द फिरवला. याशिवाय महायुतीमधील अन्य लहान मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे त्या पक्षांचं अस्तित्वच धोक्यात येणार आहे. भाजपानं मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीवर उद्धव ठाकरे अतिशय सूचक भाष्य केलं.आम्ही मित्रपक्षांसाठी जागा सोडलेल्या आहेत. आता त्यांना काय जागा दाखवायची, ते भाजपानं ठरवावं, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं. भाजपानं महायुतीमधील लहान मित्रपक्षांना १८ जागा सोडल्या आहेत. मात्र त्या सर्व जागा त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवाव्यात अशी अट घालण्यात आली आहे. मित्रपक्षांना काय जागा दाखवायची, ते भाजपानं ठरवावं, असं उद्धव यांनी म्हटलं. मित्रपक्षांना जागा दाखवावी म्हणजे त्यांना कोणकोणत्या जागा द्यायच्या आहेत ते पाहावं, असं लगेचच ते पुढे म्हणाले.यावेळी उद्धव ठाकरेंना आरेतील वृक्षतोडीबद्दलदेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांनी आज धनगर, कुणबी, तेली, वंजारी समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा