शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्र निवडणूक २०१९: शेतकरी संघटनेच्या 'स्वाभिमानी' तरुणाने केला कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:14 IST

Morshi Vidhan Sabha Election 2019 Result - विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या मोर्शी मतदारसंघातून मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव भाजपला मोठा धक्का देणारा ठरला आहे

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे. भाजपा १०२ जागा, शिवसेना ५७ जागांवर आघाडी आहे. काँग्रेस ४७ जागा, राष्ट्रवादी ५३ जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र या सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपा-शिवसेना महायुतीमधील ६ मंत्र्यांना जनतेने पराभूत केलं आहे. 

महाआघाडीतील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघात कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना ९५ हजार ७२५ मते पडली तर अनिल बोंडे यांना ८५ हजार ९५३ मते पडली. देवेंद्र भुयार हे अमरावतीत जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. अनिल बोंडे या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर भाजपाकडून २०१४ मध्ये पुन्हा निवडून आले. यंदा बोंडे हॅट्रिक करणार का याकडे लक्ष होतं. मात्र देवेंद्र भुयार यांनी बोंडे यांचा दारुण पराभव झाला आहे. 

विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या मोर्शी मतदारसंघातून मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव भाजपला मोठा धक्का देणारा ठरला आहे. देवेंद्र भुयार हा अवघ्या तीस वर्षांचा आक्रमक तरुण त्यांच्याविरुद्ध निवडून आला. देवेंद्रला तिकीट दिल्यामुळे 'रिलॅक्स' झालेल्या कृषिमंत्र्यांनी ‘यापूर्वी मी सत्तर हजार मतांनी निवडून आलो, आता दीड लक्ष मतांनी निवडून येऊन नवा विक्रम करणार’ अशा गर्जना करणे सुरू केले होते.

राजकारणातला दांडगा अनुभव, दिमतीला कॅबिनेट मंत्रिपद असतानाही देवेंद्रने मारलेली मुसंडी राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे. देवेंद्र भुयारांना तिकीट देण्यासाठी राजू शेट्टी यांनी पराकोटीचा हट्ट धरला होता. त्यांचा तो हट्ट भुयारांनी सार्थकी लावला. दमदार आंदोलनांसाठी भुयार मोर्शी मतदारसंघाला सुपरिचित आहेत. आता मतदारांनी आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घातल्यामुळे मतदारांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मोर्शी मतदारसंघात माळी मतांचा आकडा ४९ हजारांच्या घरात आहे. ती मते या निवडणुकीत निर्णायक होती. बोंडे यांचे भाजपजनांशी असलेले संबंध आणि भाजपने त्यांच्यासाठी केलेले काम, हे मुद्देही महत्त्वाचे आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019morshi-acमोर्शीAnil Bondeअनिल बोंडेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी