शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

महाराष्ट्र निवडणूक 2019: फडणवीसांच्या राजीनाम्यावर 'मिसेस मुख्यमंत्री' म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 10:16 AM

अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या भावना

मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या काही तास आधी फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या राजीनाम्याचं पत्नी अमृता यांनी कौतुक केलं आहे. मला तुमच्या निर्णयाचा आणि भूमिकेचा अभिमान वाटतो, असं ट्विट अमृता यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा, महाराष्ट्र भाजपाला टॅगदेखील केलं आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. निवडणूक निकाल जाहीर होऊन 2 आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे.  राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला. मात्र शिवसेना, भाजपाला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आला नाही. शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यासाठी शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. मात्र त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही शब्द शिवसेनेला देण्यात आला नव्हता, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी ते घेतले नाहीत असं सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. माझे फोन घ्यायला वेळ नाही. मात्र विरोधकांशी चर्चा करायला त्यांना वेळ आहे, असा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची माणसं जी वक्तव्यं करताहेत, त्यामुळे सरकार स्थापन होत नाही. आम्ही प्रत्युत्तर देऊ शकत नाही, असं समजू नका. तुमच्या भाषेपेक्षा जास्त प्रभावी भाषा आम्ही वापरू शकतो. पण आम्ही तसं करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीस