शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवलेवाडीत घड्याळाला दिलेले मत कमळाला? निवडणूक अधिकारी म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:35 IST

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी नवलेवाडीत मतदान सुरु होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी मतदान पार पडले, मात्र साताऱ्यातील खटाव तालुक्यातील नवलेवाडी या मतदारसंघात घड्याळाला दिलेलं मतदान कमळाला होत असल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. मात्र या संपूर्ण प्रकरणात काही तथ्य नाही अशी कोणतीही घटना घडली नाही असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलावडे यांनी दिलं आहे. 

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी नवलेवाडीत मतदान सुरु होते. यावेळी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी उमेदवारांचे प्रतिनिधी दिपक पवार आणि दिलीप वाघ यांनी हे मतदानापूर्वी उपस्थित होते. अभिरुप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. इतकचं नाही तर सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती त्यावेळीही कोणत्याही मतदारांनी आक्षेप घेतला नाही. मात्र त्यानंतर दिपक पवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानांसाठी जोडपत्र १५ भरुण देण्याची सूचना केली मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. 

कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मॉक ड्रीलवेळी ईव्हीएम चांगले होते. मात्र, सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममध्ये घडाळ्याचे बटन दाबले असता कमळाचे म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यामागची माहिती जाणून घेतली असता खरे सत्य समोर आले.

सकाळी 10 च्या सुमारास या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे मतदान करताना एरर दाखवू लागले. वरचे किंवा खालच्या बाजुचे कुठलेही बटन दाबले जात असता ते दाबलेच जात नव्हते. याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना लागली. ईव्हीएममध्ये बिघाड की कमळाला मतदान होते याची चाचपणीही त्यांनी केली आणि खरा प्रकार समोर आला.

योगायोगाने शिंदे यांच्या मुलाच्या कारचा चालक नवलेवाडीचा रहिवासी होता. यामुळे शिंदे यांच्या मुलाने मतदान केंद्रावर जाऊन मशीनची पाहणी केली. यावेळी कोणतेच बटन दाबले जात नसल्याचे दिसून आले. शेवटी हे मशीन त्यांच्यासमोरच रिस्टार्ट करण्यात आले आणि मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. यामुळे या मशीनच्या बिघाडाची किंवा तक्रारीची कोणतीच नोंद झाली नाही. मात्र, सकाळपर्यंत घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची अफवा राज्यभरात पसरली होती.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग