शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Maharashtra Election 2019: जाहीरनामा काढणार नाही तर फाडणार; राज ठाकरेंची भाजपा- शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 13:21 IST

Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती.

शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती. सरकारने 5 वर्षात दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत आणि आता सत्तेत येण्यासाठी पुन्हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मला एकाने विचारलं की मनसेचं जाहीनाम्याचं कायं मी त्याला म्हणलं मी जाहीरनामा काढणार नाही तर विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा फाडणार असं म्हणत मनसेप्रमुखराज ठाकरेंनी भाजपा व शिवसेनेने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपने तिकिटं दिली, मग काय बदल झाला? काय बदल होणार आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणे नोटबंदीसारख्या निर्णयामुळे आज देशभरात मंदी आली आहे. हे आर्थिक मंदीचे दिवस कुणामुळे आले? त्यात भाजपाचे कायदामंत्री रवीशंकर प्रसाद म्हणतात 'हिंदी चित्रपट कोट्यवधी कमावतात म्हणजे मंदी नाही.' मग देशातले सर्व उद्योगधंदे बंद होत आहेत, ह्याला काय म्हणतात? हजारो तरुण बेरोजगार होत आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. यवतमाळमधील वणी मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते.

दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे असं भाजपाने जाहिरनाम्यात लिहिलं होतं. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या कशा वाढल्या? गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच  ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, पूल कोसळले माणसं मेली, या गोष्टींचा राग येत नाही, 5 वर्षापूर्वी यांनी काय सांगितले, किती गोष्टी केल्या याबाबत कोणीही विचारणा केली नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्याचं भाषण होण्यापूर्वी बाजूच्या गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yavatmal-acयवतमाळ