शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

Maharashtra Election 2019: तिथं हिरव्याला गाडा म्हणतात अन् इथं... ; आव्हाडांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 22:14 IST

Maharashtra Election 2019: औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कळवा मतदारसंघात आपल्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना, भाजपा-शिवसेनेचे हस्तक मला संपवून टाकण्यासाठी बंदुक घेऊन फिरत आहेत. जितेंद्र आव्हाडचीही किंमत लावली होती. जितेंद्र आव्हाड सगळं विकेल, जितेंद्र आव्हाड आपलं इमान आणि स्वाभिमान कधीही विकणार नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. आपल्या सभेत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली.  

औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन धनुष्यबाणाचा तीर मारा, असे उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेत आहेत. माझ्या मतदारसंघात शिवसेना आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझ्या घराबाहेर 4 जण उभे होते, मला ठार मारण्यासाठी. गौरी लंकेश यांना ज्यांनी जीवे मारलं, तेच ते लोकं होते. पण, माझ्या मृत्युची तारीख परमेश्वरच ठरवेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. आव्हाड यांनी मोदी सरकारवरही टीका केली. सकाळ-संध्याकाळ मोदी फक्त पाकिस्तान-पाकिस्तान एवढंच करतात. पण, पाकिस्तानकडून तेच साखर मागवितात, तेच पाकिस्तानकडून कांदा मागवतात. हम बेवफा हरगीस न थे, पर वफा कर ना सके... असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टोला लगावला. 

दरम्यान, आव्हाड यांनी देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना, तरुणांचा रोजगार गायब होत आहे. पारले जी कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचंही आव्हाड यांनी म्हटले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019